पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर शिंदे गटाचे लोकसभेचे नेते राहुल शेवाळे यांनी गंभीर आरोप केले तर दुसऱ्या बाजूला आता शिवसेनेतील नेत्यांनी राहुल शेवाळे यांच्यावर एका पीडित महिलेने दाखल केलेल्या गुन्हांबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सध्या भाजप शिंदे गट आणि शिवसेनेत जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे.
दिशा सालियन प्रकरणी राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर विधानसभेत मोठा गदारोळ होऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत करण्याची घोषणा केली. तर दुसरीकडे फॅशन डिझायनर रिंकी बक्सल यांच्यावर राहुल शेवाळेंनी केलेल्या लैंगिक अत्याचार व मानसिक त्रासाबद्दल कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेत शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी केली. त्यावर तातडीने सभापती निलम गोऱ्हे यांनी कायंदेंची मागणी मान्य केली.
“बोम्मईंवर महाराष्ट्रात खटला करून दाखवा”; राऊतांचं शिंदे-फडणवीसांना आवाहन
आता यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी या प्रकरणी अमृता फडणवीस यांनी लक्ष्य घालण्याची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की, इथं न्याय होणार आहे. राहुल शेवाळे यांनी अत्याचार केलेल्या रिंकी बक्सला यांना न्याया देण्यासाठी गायिका अमृता फडणवीस ताई यांनी निष्क्रिय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घ्यावी. अशी मागणी रूपाली पाटील यांनी केली आहे.
बचके रहना रे बाबा..! फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपचा डाव, भुखंड प्रकरण शिंदेंवरच उलटणार
दरम्यान, दोन दिवसापुर्वी मनिषा कायंदे यांनी हा प्रकरण विधान परिषेद मांडला. राहुल शेवाळे यांच्यावर असलेल्या बलात्कार आरोपाप्रकरणी पीडित महिलेवर प्रचंड दबाव आहे. व या प्रकरणी पोलीस का हस्तक्षेप करत नाहीत? या प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी शिवसेना पक्षाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी केली. त्यावर राहुल शेवाळे यांनी फॅशन डिझायनर रिंकी बक्सल यांच्यावर राहुल शेवाळेंनी केलेल्या लैंगिक अत्याचार व मानसिक त्रासाबद्दल दाखल तक्रारींची दखल घेऊन एआयटी स्थापन करण्यासाठी केलेली मागणी सभापतींनी मान्य केली.
Read also
- “दिल्लीने डोळे वटारल्यामुळे यांच्या तोंडातून शब्दही निघत नाही”
- “गेली चार दिवस मी सभागृहात घसा फुटेपर्यंत ओरडतोय, पण..;” आव्हाडांची नाराजी
- राजकारण तापणार…! फडणवीसांवर सोमवारी अधिवेशनात विरोधी पक्षांकडून हक्कभंगाचा प्रस्ताव
- “वन मंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांना वाघ खात असतील तर..;”राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- नागपूर दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंची पावलं मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेली अन्