नागपूर : एनआयटी भुखंड प्रकरणाच्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बचावासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. यावरून दोन्ही सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी धोर धरू लागली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांवर भाजप आमदारच आरोप करीत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी देखील करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली आहे.
“अन् 32 वर्षाच्या तरूणाला सरकार किती घाबरलंय हे महाराष्ट्र बघणार”
अलिकडेच प्रदेशाध्यक्ष असे पर्यंत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस बघायचे आहेत, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. विधानसभेच्या दुसऱ्या दिवशी भुखंडाचा विषय विरोधकांनी उचलून धरला. मात्र यावर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा हा प्रयत्न हाणून पाडला. परंतु शिंदेंवर भाजपच्याच आमदारांनी आरोप केल्याची चर्चा विधानभवन परिसरात सुरू आहे.
“राहुल शेवाळे कोण, ते 2024 ला संसदेत दिसणार नाहीत”; राऊतांचा सुचक इशारा
दोन्ही सभागृहात भुखंडाचा विषय विरोधकांनी उचलून धरला असता, त्यांना भाजपच्या आमदारांनीही साथ दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, नागोराव गाणार यांनी बुधवारी विधान परिषदेत एनआयटीकडून गुंठेवारी अधिनियामांर्गत करण्यात आलेल्या नियमितीकरणात गैरव्यवहार झाल्याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला होता.
“…म्हणून माझं निलंबण केलं”; जंयत पाटलांनी सांगितली खरी हकीकत
दरम्यान, प्रन्यासच्या माध्यमातून गुंठेवारी कायद्यानुसार सुरू असणाऱ्या नियमितीकरणात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. अनधिकृतपणे मागील दिनांकांचे स्टॅम्प पेपर घेऊन जामीन मालक व भुखंड धारक यांचे खोटे करार दाखवून भुखंड वाटप करण्यात आले हे खरे आहे का?तसे असल्यास प्रस्नासमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेचे लेखापरिक्षण करावे, अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे. यावरून काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी बचके रहना रे बाबा बचके रहना रे, असं म्हणत शिंदेंना डिवचलं आहे.
बचके रहना रे बाबा बचके रहना रे…..🤔 pic.twitter.com/mGLb0SjZud
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 23, 2022
Read also
- देवेंद्र फडणवीस पुण्यातून अचानक दिल्लीला रवाना, चर्चांना उधाण
- “राज्यात अधिवेशन सुरू आहे का नाही, तेच काही समजत नाही”; संभाजी राजेंची नाराजी
- “राहुल शेवाळेंचं मनिषा कायंदेंवर गंभीर आरोप, गुंडाच्या माध्यमातून दिली धमकी”
- “कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय”
- “आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट झालीच पाहिजे”; नवनीत राणांची मागणी