नवी दिल्ली : ज्या पद्धतीने श्रद्धा वालकर प्रकरणी आफताब पुनावालाची नार्को टेस्ट झाली होती. तशीच नार्को टेस्ट दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचीही झाली पाहिजे. यामधून आपल्याला या प्रकरणातील अनेक गोष्टी उघड होतील. असं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सांगितलं आहे. तसेच आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट झालीच पाहिजे. असं काल आमदार रवी राणा यांनी देखील मागणी केली होती.
जयंत पाटलाचं निलंबन, उद्या राष्ट्रवादीचं संपुर्ण राज्यभरात आंदोलन
महाविकास आघाडी सरकार असताना पोराला वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबलं होतं. तेव्हा या प्रकरणात मोठा घोळ केला. यात सीसीटिव्ही मिळू दिले नाहीत. ते सीसीटीव्ही फुटेज कुठे गेलेत? त्यामुळे आता राज्याच्या गृहमंत्र्यांनी जी एसआयटीची चौकशी करण्यासाठीची घोषणा केली आहे. त्यातून उघड झालं पाहिजे. त्यामुळे या प्रकरणावर माझ्यासह राज्यातील आमदारांचा आदित्य ठाकरेंवर संशय येत आहे. त्यामुळे त्यांनी चौकशीला सामारें जावं. असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
“या निर्लज्ज सरकार विरोधात लढत राहणार..!” निलंबणाची कारवाई नंतर पाटलाचं सुचक ट्विट
तसेच संजय राऊतांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दाऊदचे एजंट असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, सीमावादाच्या प्रश्नावर दोन्ही राज्यांमध्ये मध्यस्थी केली जावी, पंरत काही लोकं सकाळी उठून निव्वळ पोपटपंची करत आहेत. यामधून नुकसान होत आहे. त्यामुळे या गोष्टीमध्ये आग विझवण्यापेक्षा आपण अजून पेट्रोल टाकू नये, असा टोलाही नवनीत राणा यांनी संजय राऊतांना हाणला आहे.
पुण्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन..! कर्करोगाशी झुंज अखेर शेवट ठरली
दरम्यान, मागील काही दिवसापासून राज्याच्या राजकीय वातावरण गोंधळ निर्माण झाला आहे. हिवाळी अधिवेशात आज काल झालेल्या सर्व प्रकाराबाबत विधानसभेत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आघाडीतील सर्व नेत्यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केलं आहे. तर काल संपुर्ण दिवसभरात राष्ट्रवादीकडून विधानसभा अध्यक्षांच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात येणार आहेत.
Read also
- “अन् 32 वर्षाच्या तरूणाला सरकार किती घाबरलंय हे महाराष्ट्र बघणार”
- “राहुल शेवाळे कोण, ते 2024 ला संसदेत दिसणार नाहीत”; राऊतांचा सुचक इशारा
- “…म्हणून माझं निलंबण केलं”; जंयत पाटलांनी सांगितली खरी हकीकत
- “जनतेच्या प्रश्नांना सामाेरे न जाणाऱ्या डरपोक सरकारच्या दडपशाहीचा निषेध”; सुप्रिया सुळे
- “मिंधे सरकारने लोकशाहीचा आज खून केला”; अन् आदित्य ठाकरे संतापले