नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेत मोठा गोंधळ बघायला मिळत आहे. आतापर्यंत ६ वेळा सभागृह तहकुब करण्याचा निर्णय घेतला आहे. दिशा सालियन प्रकरणावरून शिवसेनेचे नेते भास्करराव जाधव यांना बोलू द्यावे,अशी विनंती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी केली. त्यावर अध्यक्षांनी आक्षेप नोंदवत भास्कर जाधव यांना बोलू न दिलं. त्यावर तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका, असं म्हणत जयंत पाटील यांनी वक्तव्य केलं. त्यानंतर सभागृहात सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी जयंत पाटलांना निलंबित करण्याची मागणी केली.
“आफताबाची जशी नार्को टेस्ट झाली तशी आदित्य ठाकरेंची करा”; नितेश राणेंची सभागृहात मागणी
त्यावर आता राष्ट्रवादीचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करत राज्य सरकारचा निषेध केला आहे. केवळ सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना बोलण्याची संधी देताना विरोधी पक्षाच्या नेत्यांना संधी नाकारण्याचा निर्लज्जपणा नार्वेकरांनी केला. हे सत्य सभागृहासमोर मांडणारे नेते जंयत पाटील यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करत नार्वेकरांनी निर्लज्जपणाची पुढची पातळी गाठली असं म्हणत त्यांच्यावर कडाडून टिका केली आहे.
दिशा सालियन, सुशांत सिंह प्रकरण पुन्हा चर्चेत…! राज्यसभेत मोठा गदारोळ
तर दुसरीकडे जयंत पाटलांना निलंबन केल्याने राष्ट्रवादीने उद्या संपुर्ण राज्यात राहुल नार्वेकर यांच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. जंयत पाटील यांच्या सारख्या अभ्यासू आणि सयंमी नेत्यांचे निलंबन करून हुकूमशाही पद्धतीने सभागृह चालवणाऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार आहे. असं राष्ट्रवादीचे युवा प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी म्हटलं आहे.
Read also
- “या निर्लज्ज सरकार विरोधात लढत राहणार..!” निलंबणाची कारवाई नंतर पाटलाचं सुचक ट्विट
- पुण्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन..! कर्करोगाशी झुंज अखेर शेवट ठरली
- जंयत पाटलांवर निलंबणाची कारवाई..! सभागृहात राडा सुरू असतांना अजित पवार उठले, अन्…
- राजकारण तापलं…!”मला सुरक्षा द्या, रिया चक्रवर्तीची मागणी..! AU चा आदित्य ठाकरेंशी संबंध नाही”
- “दिशा सालियन प्रकरणाची SIT मार्फत चौकशी..!” फडणवीसांची घोषणा, सभागृह 6 वेळा तहकुब