नागपूर : दिशा सालियन प्रकरणावरून आज विधानसभेत मोठा गदारोळ माजला. सत्ताधारी पक्षांच्या आक्रमक पवित्र्यानंतर तालिका अध्यक्षांनी सभागृह तब्बल सहा वेळा तहकुब करावं लागलं आहे. तर दिशा सालियन प्रकरणाची आता नव्याने एसआयटी मार्फत चौकशी केली जाणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच यानंतर मग पुजा चव्हाण प्रकरणाची देखील चौकशी केली जावी, अशी मागणी आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि संजय राठोड यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी..! राऊतांच्या जामीन अर्जावर सही करणाऱ्यालाच शिंदेंनी पक्षात घेतलं
काल शिंदे गटातील लोकसभेचे नेते राहुल शेवाळे यांनी रिया चक्रवर्तीच्या फोनवर 44 वेळा AU चे फोन असल्याचं म्हटलं होतं. यावर चौकशी केली असता मुंबई पोलिसांनी आणि बिहार पोलिसांनी वेगवेगळे पुरावे दिले आहेत. त्यावरून याची चौकशी व्हावी याची मागणी केली. त्यानंतर आज सकाळपासून शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी ही मागणी लावून धरली. यानंतर सभागृहात दोन्ही पक्षांच्या बाजूने मोठा गोंधळ घातल्याने सभागृह तहकुब करण्याचा निर्णय घेतला.
“आमदारांच्या कपबशा टॉयलेट मध्ये धुतांनाचा व्हिडीओ व्हायरल”; राष्ट्रवादीचा खोचक टोला
यानंतर भाजप आमदार आणि इतर सदस्यांनी दिशा सालियन चौकशीची मागणी लावून धरली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य करत या प्रकरणाची आता एसआयटी मार्फत चौकशी होईल, याची घोषणा केली. दरम्यान दुसऱ्या बाजूला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत आक्रमक भुमिका घेत मग पुजा चव्हाण प्रकरणाचीही चौकशी करावी अशी मागणी केली. त्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं गाजलं आहे.
“जनतेच्या पैश्यांची रेवडी करून मुठभर लोकांच्या घश्यात घातली”; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
दरम्यान, या प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, राज्यपाल हटाव, आणि बेताल मंत्र्यांच्या वक्तव्याचा मुद्दा उचलत आहेत. परंतु सत्ताधारी पक्ष एकनाथ शिंदे, आणि इतर मुद्दे भरकटवण्यासाठी हे सर्व चौकशी करीत आहे. यावर कितीही चौकशी केली तरी त्या चौकशीला सामारे जाण्यास तयार आहे. परंतु सत्ताधारी पक्षच सभागृहात कामकाज न करता तहकुब करीत असेल तर हे महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही. असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Read also
- “आफताबाची जशी नार्को टेस्ट झाली तशी आदित्य ठाकरेंची करा”; नितेश राणेंची सभागृहात मागणी
- दिशा सालियन, सुशांत सिंह प्रकरण पुन्हा चर्चेत…! राज्यसभेत मोठा गदारोळ
- “गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकार्न”, विरोधकांची नवी घोषणा, परिसर दणाणला
- “मुंबई पालिकेत 1 कोटी रूपयात किती उंदिर मारले?” आशिष शेलारांचा सभागृहात सवाल
- फोन टॅपिंग प्रकरण..! अध्यक्षांनी चर्चा करण्याची थांबवली, विरोधकांचा सभागृह त्याग