नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेत मोठा गोंधळ बघायला मिळत आहे. आतापर्यंत ६ वेळा सभागृह तहकुब करण्याचा निर्णय घेतला आहे. दिशा सालियन प्रकरणावरून शिवसेनेचे नेते भास्करराव जाधव यांना बोलू द्यावे,अशी विनंती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी केली. त्यावर अध्यक्षांनी आक्षेप नोंदवत भास्कर जाधव यांना बोलू न दिलं. त्यावर तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका, असं म्हणत जयंत पाटील यांनी वक्तव्य केलं. त्यानंतर सभागृहात सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी जयंत पाटलांना निलंबित करण्याची मागणी केली. यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकारण तापलं…!”मला सुरक्षा द्या, रिया चक्रवर्तीची मागणी..! AU चा आदित्य ठाकरेंशी संबंध नाही”
आपला राष्ट्रवादी काॅंग्रेस हा पक्ष संसदीय मर्यादा व पंरपरा पाळणारा पक्ष आहे. पण तरीही सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर विरोधकांना बोलू दिले जात नाही. त्यांचा आवाज दडपला जातो. आज तर कहरच झाला. विरोधी पक्षनेते अजित पवार हे सातत्याने विनंती करीत असताना देखील विधानसभा अध्यक्षांनी ऐकले नाही. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टिका केली.
“दिशा सालियन प्रकरणाची SIT मार्फत चौकशी..!” फडणवीसांची घोषणा, सभागृह 6 वेळा तहकुब
त्यानंतर तर थेट जयंत पाटील यांच्यासारख्या समंजस, ज्येष्ठ सदस्यांचे निलंबन करण्यात आले. जनतेच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चा झाली सरकारचे अपयश उघड होईल या भीतीपोटी अध्यक्षांच्या मार्फत ही दडपशाही सुरू आहे. जनतेच्या प्रश्नांना सामाेरे न जाणाऱ्या डरपोक सरकारच्या या दडपशाहीचा निषेध असंही त्या म्हणाल्या.
Read also
- “मिंधे सरकारने लोकशाहीचा आज खून केला”; अन् आदित्य ठाकरे संतापले
- जयंत पाटलाचं निलंबन, उद्या राष्ट्रवादीचं संपुर्ण राज्यभरात आंदोलन
- “या निर्लज्ज सरकार विरोधात लढत राहणार..!” निलंबणाची कारवाई नंतर पाटलाचं सुचक ट्विट
- पुण्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन..! कर्करोगाशी झुंज अखेर शेवट ठरली
- जंयत पाटलांवर निलंबणाची कारवाई..! सभागृहात राडा सुरू असतांना अजित पवार उठले, अन्…