नागपूर : राज्यात अधिवेशन चालू आहे की नाही हा प्रश्न आहे. राज्यात मराठा आरक्षणासह इतर काही मुद्दे आहेत. परंतु हे सर्व बाजूला सारून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्यामुळे राजकारणी नेते फक्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशी टिका स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजी राजे यांनी राज्य सरकारवर केली आहे.
“…म्हणून माझं निलंबण केलं”; जंयत पाटलांनी सांगितली खरी हकीकत
हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस असून यावेळीचा हिवाळी अधिवेशन वादळी ठरत आहे. काल भुखंड भ्रष्टाचार, रश्मी शुक्ला, दिशा सालियन, सीमावाद यावरून हिवाळी अधिवेशनात हे मुद्दे चांगलेच गाजत आहेत. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली आहे. तसेच विधानसभेचं कामकाज या मुद्यांवरून काही तासच चाललं आहे. त्यावरून संभाजी राजे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
“जनतेच्या प्रश्नांना सामाेरे न जाणाऱ्या डरपोक सरकारच्या दडपशाहीचा निषेध”; सुप्रिया सुळे
राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू आहे का ते काही समजत नाही. कारण राज्यात इतर काही मुद्दे, समस्या असतांना राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करीत आहेत. याचं असं झालं. त्याचं तसं झालं. असंच काहीसं सुरू आहे. अशी टिकाही संभाजी राजे यांनी केली आहे.
“मिंधे सरकारने लोकशाहीचा आज खून केला”; अन् आदित्य ठाकरे संतापले
दरम्यान, पुण्यातील कसबा मतदार संघातील आमदार मुक्ता टिळक यांचं काल पुण्यात निधन झाल्याने आजचं कामकाज तहकुब करण्यात आलं आहे. सकाळी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ता टिळक यांचा शोक प्रस्ताव मांडला.
Read also
- “राहुल शेवाळेंचं मनिषा कायंदेंवर गंभीर आरोप, गुंडाच्या माध्यमातून दिली धमकी”
- “कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय”
- “आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट झालीच पाहिजे”; नवनीत राणांची मागणी
- “अन् 32 वर्षाच्या तरूणाला सरकार किती घाबरलंय हे महाराष्ट्र बघणार”
- “राहुल शेवाळे कोण, ते 2024 ला संसदेत दिसणार नाहीत”; राऊतांचा सुचक इशारा