नागपूर : काल दिशा सालियन प्रकरणावरून राज्यातील विधानसभेचं सभागृह चांगलचं चर्चेत आलं आहे. काल शिंदे गटातील लोकसभेचे गटनेेते राहुल शेवाळे यांनी यांनी दिशा सालियन प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. त्यावरून राज्याच्या विधानसभेत चांगलचं गदारोळ माजला. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली जाण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर दुसऱ्या सभागृहात शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांची चौकशी करण्याची मागणी केली.
“जनतेच्या प्रश्नांना सामाेरे न जाणाऱ्या डरपोक सरकारच्या दडपशाहीचा निषेध”; सुप्रिया सुळे
शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. विधानसभेत राहुल शेवाळेंचं पत्र वाचत शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे म्हणाले की, मनिषा कायंदे यांनी गुंडाच्या माध्यमातून धमकी दिली तसेच ब्लॅकमेलिंग करण्याचं काम केलं.
“मिंधे सरकारने लोकशाहीचा आज खून केला”; अन् आदित्य ठाकरे संतापले
याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. पुन्हा तक्रार मागे घेण्यासाठी माजी आमदारांवर गुंडाच्या माध्यमातून दबाव आणला गेला. त्यामुळे राहुल शेवाळेंनी दिलेल्या पत्राची नोंद घेऊन चौकशी करण्यात यावी असं दिलीप लांडेंनी सभागृहात सांगितलं. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे.
जयंत पाटलाचं निलंबन, उद्या राष्ट्रवादीचं संपुर्ण राज्यभरात आंदोलन
दरम्यान, राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. संबंधित महिलेने राहुल शेवाळे यांच्या मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे राहुल शेवाळे यांची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी काल विधान परिषदेत मनिषा कायंदे यांनी केली होती. त्यावरूनही सभागृहात मोठा गोंधळ बघायला मिळाला.
Read also
- “कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय”
- “आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट झालीच पाहिजे”; नवनीत राणांची मागणी
- “अन् 32 वर्षाच्या तरूणाला सरकार किती घाबरलंय हे महाराष्ट्र बघणार”
- “राहुल शेवाळे कोण, ते 2024 ला संसदेत दिसणार नाहीत”; राऊतांचा सुचक इशारा
- “…म्हणून माझं निलंबण केलं”; जंयत पाटलांनी सांगितली खरी हकीकत