पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. मागील चार दिवस अधिवेशनाचे विविध मुद्यांवरून वादळी ठरले आहेत. काल भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झाल्याने आज दोन्ही सभागृहाचं कामकाज बंद करण्यात आलं आहे. यावरून सभागृहात मागील दोन ते तीन दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
“कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ४० आमदारांना घेऊन त्यांनी गुवाहाटी गाठली. त्यावरूनही त्यांच्यावर सातत्याने टिका केली जात आहे. यातच महाराष्ट्र आणि कर्नाटक मुद्यांवरून आपले मुख्यमंत्री गप्प बसले आहेत. असा आरोपही त्यांच्यावर केला जात आहे. याच पार्श्वभूमीवरून रोहित पवारांनी दादा कोंडके यांचा एक फोटो ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
“आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट झालीच पाहिजे”; नवनीत राणांची मागणी
आजच्या राजकीय परिस्थितीबाबत दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या चित्रपटांच्या भाषेत बोलायचं झालं तर. मला घेऊन चला म्हणून पळवा पळवी करत तुमचं आमचं जमलं म्हणत सोंगाड्य़ांचं राज्य आलं खरं पण सध्या खोल दे मेरी जुबान असं म्हणण्याची वेळ राज्यातल्या सामान्य माणसावर आलीय. अरे राज्याच्या भल्यासाठी थोडी तरी आगे की सोच असू द्या. नाहीतर ज्यांनी मोठ्या अपेक्षेनेे निवडून दिलं तेच उद्या म्हणतील वाजवू का ? असा सवालही त्यांनी केला आहे.
“अन् 32 वर्षाच्या तरूणाला सरकार किती घाबरलंय हे महाराष्ट्र बघणार”
दरम्यान, सध्या इथल्या सरकारला अनेक शेपट्या फुटल्या आहेत. तुम्ही इतर विषयामध्ये शेपट्या घालाल. परंतु वीस लाख बांधवांनासाठी 70 ते 75 वर्ष लढा देत आहोत. किमान त्यांच्यासाठी तरी महाराष्ट्राशी इमान राखा, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी शिंदेंना सुनावलं. चीनने जगभरात घुसखोरी केली आहे. त्यात भारताचा देखील समावेश आहे. तशाच प्रकारची घुसखोरी करण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार करीत आहे. त्याच पद्धतीने तुम्ही देखील बेसावधपणे मार्ग अवंलबत असेल तर आम्हाला देखील हा मार्ग पत्करावा लागेल, असा इशाराही त्यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.
आजच्या राजकीय परिस्थितीबाबत दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या चित्रपटांच्या भाषेत बोलायचं झालं तर…
‘मला घेऊन चला’ म्हणून ‘पळवा पळवी’ करत ‘तुमचं आमचं जमलं’ म्हणत ‘सोंगाड्यां’चं राज्य आलं खरं!
पण सध्या ‘खोल दे मेरी जुबान’ असं म्हणण्याची वेळ राज्यातल्या सामान्य माणसावर आलीय… pic.twitter.com/sYvv8qm4Pf— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 23, 2022
Read also
- “बोम्मईंवर महाराष्ट्रात खटला करून दाखवा”; राऊतांचं शिंदे-फडणवीसांना आवाहन
- बचके रहना रे बाबा..! फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपचा डाव, भुखंड प्रकरण शिंदेंवरच उलटणार
- देवेंद्र फडणवीस पुण्यातून अचानक दिल्लीला रवाना, चर्चांना उधाण
- “राज्यात अधिवेशन सुरू आहे का नाही, तेच काही समजत नाही”; संभाजी राजेंची नाराजी
- “राहुल शेवाळेंचं मनिषा कायंदेंवर गंभीर आरोप, गुंडाच्या माध्यमातून दिली धमकी”