नागपूर : नागपूर येथील एनआयटी भुखंड प्रकरणाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात सोमवारी हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याचं काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. तर यावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस पुण्यातून अचानक दिल्लीला रवाना, चर्चांना उधाण
राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना या प्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंविरूद्ध कोर्टात याचिका दाखल केली होती. परंतु राज्यात सरकार बदलल्यानंतर त्यांनी आपली याचिका मागे घेतली. आता त्यांचीच वकिली फडणवीस सभागृहात करताना दिसत आहेत. त्यामुळे आम्ही सोमवारी हा मुद्दा पुन्हा उचलून धरणार आहोत.
“राज्यात अधिवेशन सुरू आहे का नाही, तेच काही समजत नाही”; संभाजी राजेंची नाराजी
त्याचबरोबर दिशा सालियन प्रकरणाची सीबीआयने चौकशी केली आहे. परंतु या प्रकरणाबाबतही फडणवीसांनी चुकीची माहिती सभागृहात दिली आहे. असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यावर भाजपचे आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांनी असा हक्कभंग कुणावरही आणला जात नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- “वन मंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांना वाघ खात असतील तर..;”राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- नागपूर दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंची पावलं मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेली अन्
- “सध्या मुख्यमंत्र्यांना ‘खोल दे मेरी जुबान’ असं म्हणण्याची वेळ”; कोंडगेंचा फोटो ट्विट करून राष्ट्रवादीने डिवचलं
- “बोम्मईंवर महाराष्ट्रात खटला करून दाखवा”; राऊतांचं शिंदे-फडणवीसांना आवाहन
- बचके रहना रे बाबा..! फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपचा डाव, भुखंड प्रकरण शिंदेंवरच उलटणार