पुणे : भाजपचे मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे मोठा अपघात झाला आहे. साताऱ्यातील फलटण येथील मलठण येथे हा भीषण अपघात झाला आहे. त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील रूबी रूग्णालयात आणण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
“वन मंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांना वाघ खात असतील तर..;”राष्ट्रवादीचा हल्लाबोल
साताऱ्याहून आपल्या मतदारसंघाकडे म्हणजेच माण-खटावच्या दिशेने जात असतांना जयकुमार गोरे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार सुमारे 50 फुट खोल दरीत कोसळी. आज पहाटे त्यांच्या गाडीचा फलटण येथील मलठाण येथे हा अपघात झाला आहे.
नागपूर दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंची पावलं मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेली अन्
अपघात झाल्यानंतर सुरूवातीला त्यांना साताऱ्यातील रूग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यानंतर लगेचच त्यांना पुण्यातील रूबी रूग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांनी आता अतिदक्षता वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या तिथेच उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघात जयकुमार गोरे यांच्या छातीला, पाठीला आणि हाताला दुखापत झाली आहे. रूबी रूग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती दिली आहे. तसेच ते शुद्धीवर आले असून उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. लवकरतच ते यातून बरे होतील अशीही माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
Read also
- “पोटातलं ओठावर आलंच, मनसेने शेअर केला तो सेना अन् राष्ट्रवादीचा व्हिडीओ
- “या प्रकरणी अमृताताईंनी निष्क्रिय गृहमंत्री फडणवीसांच्या विरोधात आक्रमक भूमिका घ्यावी”
- “दिल्लीने डोळे वटारल्यामुळे यांच्या तोंडातून शब्दही निघत नाही”
- “गेली चार दिवस मी सभागृहात घसा फुटेपर्यंत ओरडतोय, पण..;” आव्हाडांची नाराजी
- राजकारण तापणार…! फडणवीसांवर सोमवारी अधिवेशनात विरोधी पक्षांकडून हक्कभंगाचा प्रस्ताव