मुंबई : केंद्र सरकारने रेशनची नवीन पॉलिसी आज जाहीर केली आहे. मागच्या वेळी ४० आमदारांना ५० कोटी रूपये देऊन फोडण्यात आले होते. त्यावर महाराष्ट्रात अगोदरच एसआयटी स्थापन झाली पाहिजे होती. परंतु जे विषय पोलीस, सीबीआयने संपवलेले आहेत. त्यावर एसआयटी स्थापन करून सत्तेचा, पोलिस यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दिशा सालियन प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा एसआयटी स्थापन करण्याची घोषणी केली आहे. त्यावर बोलतांना संजय राऊतांनी राज्य सरकारवर टिका केली आहे.
राजकारण तापणार…! फडणवीसांवर सोमवारी अधिवेशनात विरोधी पक्षांकडून हक्कभंगाचा प्रस्ताव
राज्याच्या हिवाळी अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधारी आमदारांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी लावून धरली होती. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मागणी मान्य करत त्यावर एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. या प्रकरणावरून शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यावरून आता शिवसेनेकडून राज्य सरकारवर कडाडून टिका केली जात आहे.
“वन मंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांना वाघ खात असतील तर..;”राष्ट्रवादीचा हल्लाबोल
एसआयटी मार्फत कोणत्याही चौकशीला आम्ही सामोरं जाण्यासाठी तयार आहोत. त्यात तुम्हीच तोंडावर पडणार आहात. सरकार मधील अनेक पक्षातील अनेक नेत्यांची प्रकरण समोर आलेले आहेत. त्यांचाही तपास होईल. तसेच या विषयावरून आम्ही नागपूरला जाणार आहोत. या विषयावर सरकार एसआयटी बसवण्याची मोठी खाज सुटली आहे. त्यांनी ती खाजवावी. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
नागपूर दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंची पावलं मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेली अन्
दरम्यान, एसआयटी ही अत्यंत महत्वाची अनन्यसाधारण प्रकरणामध्ये स्थापन केली जाते. परंतु या प्रकरणावरून सरकारने एसआयटी आणि पोलिसांचं महत्वाचं कमी करून टाकलं आहे. विधानसभेत कुणीही उठतो अन् एसआयटीची मागणी करतो. खोटे गुन्हे, दुसऱ्यांवर आरोप करायचे, बदनामी शस्त्र वापरायचे असे प्रकार सुरू आहेत. परंतु अशा पद्धतीने एसआयटी स्थापन करून शिवसैनिकांचं मनोधैर्य खच्चीकरण करायचं, परंतु ते भ्रमात आहेत. यातून शिवसेना आणखील उफळून बाहेर पडेल आणि काम करेल अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे.
Read also
- “भाजप आमदार जयकुमार गोरेंचा भीषण अपघात..! 50 फुट गाडी दरीत कोसळली”
- “पोटातलं ओठावर आलंच, मनसेने शेअर केला तो सेना अन् राष्ट्रवादीचा व्हिडीओ
- “या प्रकरणी अमृताताईंनी निष्क्रिय गृहमंत्री फडणवीसांच्या विरोधात आक्रमक भूमिका घ्यावी”
- “दिल्लीने डोळे वटारल्यामुळे यांच्या तोंडातून शब्दही निघत नाही”
- “गेली चार दिवस मी सभागृहात घसा फुटेपर्यंत ओरडतोय, पण..;” आव्हाडांची नाराजी