ठाणे : रस्त्याची कामे नीट करा. नाही तर कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करा. खड्ड्यांमुळे आम्हाला शिव्या खाव्या लागतात, अशा शब्दात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना फटकारले. ठाण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. खड्ड्यांमुळे प्रवाशांना सहा सहा तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत अडकून पडावेल लागले होते. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील खड्ड्यांची पाहणी करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
अजितदादा, मुख्यमंत्र्यांसोबत प्रस्ताव बनवा, मी नरीमन पॉईंट दिल्लीला जोडतो – नितीन गडकरी
एकनाथ शिंदे यांनी तीन हात नाका सिग्नलसह शहरातील विविध रस्त्यांची पाहणी केली. यावेळी महापालिकेचे अधिकारी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांसह ठाणे आणि ग्रामीण पोलीसही त्यांच्यासोबत होते. यावेळी शिंदे यांनी रस्त्यांचे डांबरीकरण सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन कामाच्या दर्जाचीही पाहणी केली.
सत्तांतर होणार? पुणेकरांचा कौल कोणाला? महाविकास आघाडीमुळे एकहाती सत्तेसाठी रस्सीखेच
यावेळी रस्त्यांची चाळण झालेली पाहून शिंदे यांनी संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जे काम केले आहे ते चांगले काम करा. पावसाळ्यापूर्वी ज्या रस्त्यांची कामे करण्यास सांगितले होते ती कामे पूर्ण करा. रस्त्यावरील खड्ड्यांच्या रोज बातम्या येत आहेत. लोक वैतागत आहेत. त्यामुळे आम्हाला शिव्या खाव्या लागत आहेत. कंत्राटदार रस्त्यांचे काम नीट करत नसतील तर त्यांना ब्लॅक लिस्ट करा, अशा सूचना देतानाच मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी देखील या कामात लक्ष घातलं पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
भ्रष्टाचाराचे पुरावे असतील तर खुशाल तक्रार करावी; प्रवीण दरेकरांना इशाऱ्याला दादाचं रोखठोक उत्तर
शहरातील पाच उड्डाणपुलावरील रस्ते नीट आहेत. मात्र, काही रस्त्यांची डागडुजी होणे बाकी आहे. मात्र, रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा करू नका. अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर करवाई करा, असं सांगतानाच शहरातील परिस्थिती लक्षात घेऊनच फाऊंटन आणि जेएनपीटीकडील वाहने सोडावी लागणार आहे, असं ते म्हणाले. शहरातील रस्त्यांची कामे आम्ही युद्धपातळीवर हाती घेतली आहे. खड्डे लवकरात लवकर बुजवले जाणार आहेत. पाऊस ओसरला की रस्त्याची कामे जोमाने सुरू करणार आहोत. निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश कंत्राटदारांना दिले आहेत. वाहतूक कोंडीमागे केवळ खड्डे हे एकमेव कारण नाही. तर मोठी अवजड वाहने, जेएनपीटीतील अवजड वाहने आदींमुळेही वाहतूक कोंडी होत आहे, असं त्यांनी सांगितलं.
Read Also :
- मोठी बातमी: ४ ऑक्टोंबर पासून शाळा सुरू होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
- स्वत:च्या घरात काय चाललंय ते बघा, दुसऱ्यांबद्दल का बोलता? – अमृता फडणवीस
- परत कोणी महिलेला स्पर्श केला…; बलात्कार प्रकरणावरून पंकजा मुंडे संतापल्या
- ‘हिंदू खतरे में है’ ही निव्वळ कल्पना, भाजपावर ३०२ चा गुन्हा दाखल करा – काँग्रेस
- भाजपला आणखी एक मोठा धक्का: पिंपरी चिंचवडच्या या बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश