नवी दिल्ली : बिहार निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दुसऱ्या टर्ममधील मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार करू शकतात. गृहमंत्रीपदी अमित शहा यांची निवड केल्यावर सत्तारूढ सर्वेसर्वा नेतृत्वाने शहा यांच्या तुलनेत फारच शांत व सौम्य स्वभावाचे नड्डा यांच्याकडे पक्षाध्यक्षपपदाची जबाबदारी दिली. तथापि त्यानंतर तब्बल 8 महिन्यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखालील नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी देताना अनेक अनुभवी नेत्यांना वगळण्यात आले. यातीलच काही नेत्यांना केंद्रीतील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनिल जैन, पी. मुरलीधर राव, सरोज पांडे, पूनम महाजन ही यातील आघाडीची नावे आहेत.
सध्या अनेक मंत्र्यांकडे दोन-तीन मंत्रालयांची जबाबदारी आहे. त्यांना त्यातून मुक्त करून नव्या चेहऱ्यांकडे वाणिज्य-उद्योग, दूरसंचार, अवजड उद्योग किंवा सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्रालयांपैकी काहींची जबाबदारी दिली जाऊ शकते. बिहारपाठोपाठ पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे वारे सुरू होणार असल्याने त्या राज्यासह आंध्र प्रदेश, केरल व तेलंगणातील नवे चेहरे मोदी मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता वर्तविली जातेय.
पूनम महाजन यांचे वडिल अटलबिहारी वाजपेयी यांच्या तेरा दिवसांच्या पहिल्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री होते. त्यानंतर ते दूरसंचारमंत्री राहिले होते. त्या मुंबईच्या खासदार आहेत. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास मुंबईत दोन केंद्रीय मंत्री होतील. पीयूष गोयल हे रेल्वेमंत्री म्हणून सध्या काम पाहत आहेत.
Read Also
आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाला आमचा विरोध : अतुल भातखळकरhttps://t.co/oGj1HIhcFm#AtulBhatkhalkar #AdityaThackarey #Bjp #Shivsena@BhatkhalkarA @bjp4mumbai
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 28, 2020