मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपने राम मंदिराचा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. त्यानंतर अयोध्येत राम मंदिर देखील पुर्ण झालं. यातच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काही ठिकाणी भाजपकडून राम मंदिराचा मुद्दा देखील बाहेर काढण्यात आला. परंतु अयोध्येत देखील भाजपचा पराभव झाला आहे. त्यावरून ठाकरे गटाने भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय.
हेही वाचा…विधानसभेत महायुतीसमोर मोठी अग्निपरिक्षा, निवडणुकीत ‘हे’ असणार आव्हाने
लोकसभा निवडणुकीत अयोध्यातील भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यानंतर चित्रकुट, प्रयागराज, नाशिक, दंडकारण्य, हम्पी, लेपाक्षी आणि रामेश्वरम अशा ठिकाणी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. विशेष करून रामायणात याठिकाणी वनवासात असतांना प्रभु श्रीरांमानी भेटी दिल्या आहेत. त्यावरूनच ठाकरे गटाने भाजपवर जहरी टिका केलीय.
हेही वाचा..“रोहित पवार स्वत: भाजपमध्ये जाऊन मंत्रीपद मिळवण्यासाठी उत्सुक”
दरम्यान, ही प्रभू श्रीरामांचीच लीला म्हणायची आहे. प्रभू श्रीरामचंद्र वनवासात असताना ज्या ज्या ठिकाणी गेले. त्या त्या प्रत्येक ठिकाणी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागलाय. प्रभू श्रीराम सत्यवचनी होते, लोककल्याणकारी होते. पण त्यांच्याच नावाने राजकारण करून, फक्त स्वतःच हित सत्ताधारी साधत असतील तर त्यांना राम पावतीलच कसे? असा खोचक सवाल ठाकरे गटाने भाजपला केलाय.
ही प्रभू श्रीरामांचीच लीला म्हणायची!
प्रभू श्रीरामचंद्र वनवासात असताना ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या प्रत्येक ठिकाणी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागलाय. प्रभू श्रीराम सत्यवचनी होते, लोककल्याणकारी होते. पण त्यांच्याच नावाने राजकारण करून, फक्त स्वतःच हित सत्ताधारी… pic.twitter.com/K9mZgzbDmx
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 8, 2024
READ ALSO :
हेही वाचा…फोडाफोडीच्या राजकारणाचा महायुतीला फटका, बच्चू कडूंचा महायुतीला घरचा आहेर
हेही वाचा..“मंत्रिपदासाठी राज्यातून भाजपची ४ नाव चर्चेत, नरेंद्र मोदींचा उद्या शपथविधी सोहळा
हेही वाचा..ठाकरेंचे दोन खासदार शिंदेंच्या संपर्कात, लवकरच करणार पक्ष प्रवेश