मुंबई : ‘सरकारविरोधात द्रोह करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्का तसेच एनआयए अंतर्गत अटक झाली पाहिजे ही आमची मागणी असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी द्रोह करणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावी, अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल’. असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
नुकतेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका ऑनलाईन वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘राज्यातील काही पोलीस अधिकारी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत होते’. देशमुखांच्या या वक्तव्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ‘या सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आता अनिल देशमुख यांच्या कोर्टात चेंडू असून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे’, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.एका वेबसाईटला मुलाखत देताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, राज्यातील काही आयपीएस अधिकारी उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला असल्याचा त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
Read Also :
केंद्र सरकारच्या कृषी विधयेकाविरोधात शेतकरी संघटना आक्रमक , २५ सेप्टेंबरला देशव्यापी आंदोलन
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी?