मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. जोपर्यंत श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता असेल, तोपर्यंत गरीब मराठ्यांना ना सत्ता मिळणार ना आरक्षण, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना आंबेडकरांनी हे विधान केले.
‘१८० ते १८२ आमदारांना हे आरक्षण नकोय. श्रीमंत मराठा विरुद्ध गरीब मराठा असं विधान आपण केलं होतं. मराठा आरक्षणाचं भवितव्य आपल्याला काय दिसतं ?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले,”जोपर्यंत श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता आहे, तोपर्यंत गरीब मराठ्यांना सत्ता मिळणार नाही आणि आरक्षणही मिळणार नाही. तेव्हा आता गरीब मराठ्यांनी काय भूमिका घ्यायची. त्यांनी त्यांची भूमिका ठरवावी. जातीबरोबर राहायचं की आपल्या आरक्षणाबरोबर राहायचं हा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे, असं स्पष्ट मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.
Read Also
मराठा आरक्षणावरून मावळ भाजप कार्यकर्त्यांकडून सरकारचा निषेदhttps://t.co/PHpgYdZi2S@BalaBhegade @BJP4PuneCity @BJP4Maharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 14, 2020