जालना : मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून देशोधडीला लागलेला शेतकरी शासनाच्या मदतीची वाट पाहात आहे. परंतु संवेदनाहीन सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही, या सरकारने बळीराजाला वाऱ्यावर सोडले आहे, अशा तीव्र शब्दांत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.
मराठवाड्यातील भीषण वास्तव मांडताना दरेकर यांनी सांगितले की, ज्या प्रकारे शेतकरी उद्ध्वस्त झाला त्यावर सरकारने गतीने उपाययोजना करणे आवश्यक होते, पण तसे काही झाले नाही. मराठवाड्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचा अभूतपूर्व पाऊस पडला आहे. एकीकडे धरणे भरली आहेत त्याचा आनंद होत आहे, पण दुसऱ्या बाजूला अतिवृष्टीमुळे शेती उद्ध्वस्त झाल्याचे दुःख पाहायला मिळत आहे.
यंदा सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस मराठवाड्यात झाला आहे. या पावसामुळे अनेक गावं उद्ध्वस्त झाली आहेत. साधारण तीन लाख 89 हजार शेतकरी बांधव नुकसानग्रस्त झाले आहेत. सरकारी आकड्यांमध्ये ही संख्या तीन लाखांवर आहे. ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मोसंबी आणि तुरीची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिने झाले तरी अद्याप पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे की सरसकट पंचनामे करा आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा करा, भाजपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण ही मागणी केल्याचे दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
Read Also :
राहुल आणि प्रियांका गांधी हाथरासमध्ये दाखल https://t.co/YEGqNjkLRr #Hathras #RahulGandhi
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 3, 2020