मुंबई : ‘एसईबीसी आरक्षण कोर्टात टिकणार नाही मात्र ईडब्लूएस आरक्षण टिकेल. एसईबीसी आरक्षण मिळूच शकणार नाही. त्यामुळे हे आर्थिक निकषावरील आरक्षण जे मिळतंय ते घ्यावं,’ अशी थेट भूमिका प्रवीण गायकवाड यांनी घेतली आहे.
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्यानंतर राज्यभरातील वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मराठा संघटनांतील मतभेद समोर आले आहेत .
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला EWS मध्ये मिळणाऱ्या सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच बरोबर सारथी संस्थेला निधी देण्याची घोषणा केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झालाय. राज्यात मराठा समाजाकडून विविध प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 3 ऑक्टोबरला पुणे येथे बैठक होत आहे.
Read Also:
मीडियाला रोखून आणि पीडित कुटुंबाला डांबून… रोहित पवार यांचा उत्तरप्रदेश सरकारवर निशाणाhttps://t.co/H0kv0F24TA#RohitPawar #NCP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 2, 2020