नवी दिल्ली : केंद्रात भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. आज नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला आहे. त्यानंतर नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू सरकार म्हणून काम करण्यास सांगितले आहे.
हेही वाचा…“मी भक्त म्हणून खूप कमी पडलो”, मोदींसाठी प्रवीण अलई यांची भावनिक पोस्ट
लोकसभा निवडणुकीच्या निकालात एकूण ५४३ जागांपैकी बहुमतासाठी २७२ जागांची आवश्यकता होती. मात्र याठिकाणी भाजपसह कोणालाही बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत २४० जागा मिळाल्या आहेत. त्यांना बहुमतासाठी अजूनही ३२ जागांची आवश्यकता आहे. तर कॉंग्रेसला ९९ जागा मिळाल्या आहेत. यातच एनडीए आघाडीने बहुमताचा आकडा पार केला आहे. परंतु एनडीएमधील काही राजकीय पक्षांची भूमिका पाहता मोदींनी आधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
हेही वाचा…बारामतीत सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, सुप्रिया सुळे पुन्हा होणार खासदार
दरम्यान, दुसऱ्या बाजला इंडिया आघाडीला देखील चांगल्या जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीने देखील सत्ता स्थापन केल्याचा दावा ठोकला आहे. एनडीएसोबत असलेले नितीन कुमार आणि चंद्राबाबु नायडू यांनी जर इंडिया आघाडीला पाठिंबा दिला तर देशात नरेंद्र मोदी यांचं सरकार कोसळून इंडिया आघाडीचं सराकर स्थापन होणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा..आता अजितदादा गटात होणार मोठा राजकीय भुंकप, १२ आमदारांची होणार शरद पवार गटात घरवापसी
हेही वाचा..“स्वत: ला ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदींचा दारूण पराभव”