मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष असावा अशी मागणी केली आहे. जोपर्यंत पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नसेल तोपर्यंत भाजपला पराभूत करणे देखील कठीण असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिकट आहे, तर सीमेवर दररोज चीन आणि पाकिस्तान यांच्यात चकमकी होत आहेत या व्यतिरिक्त आणखीही अनेक महत्त्वाचे विषय आहेत.परंतु तरीही आम्ही प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यास सक्षम नाही, कारण पक्षाकडे पूर्णवेळ अध्यक्ष नाही.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष पदावरून देशातील २३ काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष द्या कळवले होते. त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव देखील होते.
विशेष म्हणजे यातील गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा पक्ष अध्यक्षाबाबत बोलताना जर लोकनियुक्त नेत्यापैकी कोणी अध्यक्ष झाले नाही तर काँग्रेस पक्ष ५० वर्ष मागे जाईल असे विधान केले आहे.
Read Also
'देवेंद्र फडणवीसांच्या मिठाला जागणाऱ्या काही अधिकाऱ्यांची बदली केली'https://t.co/u4pvlm7N1u@mrhasanmushrif @MumbaiNCP @NCPspeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 3, 2020