मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी येत्या १ डिसेंबरला निवडणूक होत आहे. यातच यंदा महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात थेट लढत होणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने सांगलीचे अरुण लाड यांना उमेदवारी दिली आहे.
त्यासंदर्भात घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. मात्र, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय कोल्हापूरमधून राष्ट्रवादीचे भैया माने यांनीही बुधवारी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे गेल्यावेळी बंडखोरीचा फटका राष्ट्रवादीला बसला त्याचीच पुनरावृत्ती होणार असे चित्र निर्माण झाले आहे.
विधान परिषद निवडणूक यंदा चांगलीच चर्चेत आली आहे, कारणही तसेच आहे. पहिल्यांदाच महाविकास आघाडी ही निवडणूक लढणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच इच्छुकांची मनधरणी करण्यापासून ते बंडखोरी कोणी करू नये यासाठी प्रयत्न सुरू होते. ५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघ ही निवडणूक काँग्रेस लढणार आहे, तर औरंगाबाद आणि पुणे पदवीधर निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे.
Read Also :
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक, कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार?
भारत -चीन यांच्यातील सीमा तिढा सुटण्याची चिन्हे
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र सरकारचे कौतुक
भाजप आमदारांनी साथ सोडू नये म्हणूनच फडणवीसांना ‘हे’ नेहमी सांगावं लागतं….