मुंबई : हाथरास पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अटक करण्यात आली आहे. कलम १८८ अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. यादरम्यान पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी धक्काबुक्की झाल्याचे देखील पहायला मिळाले. यावरून आता अनेक नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे.
‘यमुना एक्सप्रेस वेवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे,’ असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. ‘कुठल्याही राज्याचं प्रशासन असू दे… बलात्कारासारखी लाजिरवाणी घटना घडल्यावर प्रशासनाने फास्टट्रॅक पद्धतीने ॲक्शन घेतली पाहिजे. ती व्हावी या मागणीसाठी राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जात होते. राहुल गांधी हे संसदेचे सदस्य आहेत. त्यांच्याशी असं वर्तन केलं जाणार असेल, यूपी सरकारकडून दडपशाही होणार असेल तर त्याचा जाहीर निषेध करते, असं त्यांनी म्हटलं आहे.
‘न्याय्य मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या किंवा एखाद्याच्या भेटीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधीची वा कुठल्याही व्यक्तीची पोलिसांनी कॉलर धरणं कितपत योग्य आहे, असा सवाल सुळे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला आहे.
युपी सरकारने राज्यात कलम १४४ लागू केल्याने राहुल गांधी पायी पीडितेच्या घरी जाण्यासाठी निघाले होते मात्र त्यांच्यासोबत असलेल्या जमावामुळे पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना अडवले यावेळी राहुल गांधींना पोलिसांनी जोरदार धक्काबुक्की केली. जमावाला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी पोलिसांनी लाठी हल्ला देखील केल्याचे समोर आले आहे.
Read Also
पार्थ यांच्या ‘या’ मागणीलाही कवडीची किंमत देणार का ?https://t.co/eNRinPtTwu#ParthPawar #NCP #BJP #SharadPawar #MarathaReservation
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 1, 2020