दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील घटनेने देश हादरला असून आता त्यावरून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत. काल कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा हाथरसमधील पिडीत कुटुंबातील लोकांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना रस्त्यावर अडवून उत्तर प्रदेश पोलीसांनी धक्काबुक्की केली आहे. आता यावर देशातील अनेक नेते टिका करत आहे. हाथरसच्या घटनेनरून राजकारण करणारे राहुल आणि प्रियांका गांधी राजस्थानला का भेट देत नाहीत? असा प्रश्न उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विचारला आहे.
विरोधकांनी बारन जिल्ह्यातील घटनेची तुलना हाथरसच्या घटनेशी करू नये,’ अशा शब्दांत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झालेला नाही, असे त्यांच्या वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. हाथरसच्या घटनेनरून राहुल आणि प्रियांका गांधी यांना फक्त राजकारण करायचे आहे. ते राजस्थानला का भेट देत नाहीत? तिथे काय घडते आहे, याचे उत्तर गांधी कुटुंबीय देतील का? राहुल गांधींनी राजस्थानातील घटनांकडे लक्ष द्यावं, उत्तर प्रदेश मध्ये नाही, असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगावला आहे.
‘बारन जिल्ह्यातील दोन अल्पवयीन बहिणी १९ सप्टेंबरला बेपत्ता झाल्या होत्या. त्या कोटा येथे २२ सप्टेंबरला सापडल्या. या मुलींना त्यांच्या कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आले आहे. मुली आणि त्यांच्या समवेत असणारी दोन मुले यांची वैद्यकीय तपासणी झाली असून, ती मुलेही अल्पवयीन आहेत,’ अशी माहिती पोलिसांनी दिली. राजस्थानात अल्पवयीन बहिणींचे अपहरण करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर गेहलोत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपण मर्जीने या मुलांबरोबर गेल्याचा जबाब दोन्ही मुलींनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिल्याचेही गेहलोत यांनी सांगितले. राज्यात बलात्काराच्या घटना वाढत असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते रामलाल शर्मा यांनी केला आहे.
Read Also :
राहुल गांधींना ढकललं गेलं कि स्वतःच पडले याबाबत शंका – भाजपा https://t.co/dtviqmIw3T @sachin_inc @BhatkhalkarA @meNeeleshNRane @RRPSpeaks @NitinRaut_INC
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 2, 2020