ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात उत्तर सभा पार पडणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत राज्यात प्रचंड गदारोळ माजला होता. त्यामुळे या सभेत विरोधकांनासह सत्ताधारी तसेच संपुर्ण राजकीय नेत्यांना या सभेतुन उत्तर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आता ठाण्यातील सभेतील थेट प्रेक्षपण जम्मू काश्मीरमध्ये देखील करण्यात येणार आहे. यासंबंधी काश्मीर पंडितांनी पोस्टर लावले आहेत. तर ठाण्यातील या सभेत राज ठाकरे यांनी विरोधकांवर तोप डागली. त्यावेळी त्यांनी मशिदीवरील भूमिका देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलीत.
शरद पवार स्वत: नास्तिक आहे. ते देवधर्म मानत नाहीत. शरद पवारांनी कधीही आपल्या भाषणांत छत्रपतींचं नाव घेतलं नाही. कारण भाषणांत नाव घेतलं तर मुस्लिम मतं जातील याची भिती आहे. अफजल खान महाराष्ट्र दर्शन घेण्यासाठी आला होता? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य बाबासाहेब पुरंदरे यांनी घराघरांत पोहचवलं आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण केलं आहे. त्यांना इतिहास नाही तर जात बघायची आहे. पवारांकडे घेण्यासारखं बरंच काही घेण्यासारखं गुण आहे. परंतु या गुण्याचं करायचं काय? महाराष्ट्र जातीपातीच्या चिखलात अडकला आहे. मराठा आरक्षणांसाठी लाखो मोर्चे निघाले पंरतु त्याचं पुढं काय झालं? असा सवाल देखील त्यांनी केला. तसेच आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापवण्यात आला आहे.