औरंगाबाद : महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून सभा घेतली असती तरी तुम्ही दुरदर्शनवरून पाहिलीच असती. गुढीपाडव्याची सभा आणि ठाण्यातील सभा घेतली त्यावर सध्या किती बोलत आहेत. संभाजीनगरचं मुळ नाव खडकी आहे. महाराष्ट्र दिन आज साजरा करताना आपण आज महाराष्ट्र समजून घेतला पाहिजे. जो इतिहास विसरला त्याच्या पायाखालचा भूगोल निसटतो असा हल्लाबोल आज औरंगाबाद मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे यांची सभा सुरू असताना सभेत गर्दीतून काही लोकांनी मागून खर्च्या फेकल्या. त्यावेळी ते भरसभेत म्हणाले की, जर कुणी टाळकी गडबड करायला आली असेल तर त्यांना तिथल्या तिथे हाणा. असा सज्जड दम देखील त्यांनी दिला. त्यानंतर उपस्थित लोकांनी मोठा जल्लोष केला आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी पुढील भाषण सुरू केलं, तसेच या पुढच्या सभा संपुर्ण महाराष्ट्रात होणार आहेत. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात देखील यापुढे सभा होतील, असंही ते म्हणाले.
आज संपुर्ण राज्यात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद याठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होत आहे. तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची देखील मुंबईत बुस्टर डोस सभा म्हणूून होत आहेत. अशातच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हस्ते मुंबई विमानतळावर शिवनेरीचा पुर्णकृती पुतळ्यांचं उद्घाटन करण्यात आला.
दरम्यान, औरंगाबाद येथे राज ठाकरे यांच्या सभेसाठी सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यासंदर्भात पाोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी माहिती दिली आहे. शहरात कुठेही वाद, भांडण दिसले तर नागरिकांनी हेल्पलाईन 112 वर संपर्क करावा. तसेच शहरात 750 सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणांहुन राज ठाकरे यांच्या सभेसाठी कार्यकर्ते दाखल झाले आहेत.