पुणे : गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे सरकारविरोधात चांगलेच आक्रमक होताना दिसत आहेत.मोर्चामध्ये गाईचा छळ केला म्हणून माझ्यासह कार्यकर्त्यांच्यावर गुन्हा दाखल करता. मग रेवनाथ काळे या राहुरीच्या शेतकऱ्याने दुधाला भाव नसल्याने आत्महत्या केली. या आत्महत्येस जबाबदार असणा-या दुग्धविकास मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कधी दाखल करता ?” असा जाब विचारात माजी खासदार राजू शेट्टी यांनी, “उध्दवा अजब तुझे सरकार !” असे म्हणत एक ट्विट केले आहे.
बारामतीत दूधदरासाठी आंदोलन केल्यानंतर शेट्टी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.त्यावर प्रतक्रिया देताना शेट्टी म्हणाले, दुधाच्या दरासाठी लढतोय म्हणून जर गुन्हा दाखल होत असेल तर मला त्या गुन्ह्याचा अभिमान आहे. तसेच आम्ही दुधाच्या दरासाठी लढत असताना सरकारने आमच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आम्ही अशा गुन्ह्याने खचून जाणारे नाही. उलट हे गुन्हे आमच्यासाठी दागिने आहेत. चुकीच्या गोष्टी करून हे गुन्हे दाखल झाले नाहीत तर बळीराजाच्या प्रश्नांसाठी लढताना हे गुन्हे दाखल झाले आहेत. आणि या गुन्ह्याला मी घाबरत नाही असे देखील शेट्टी यांनी सरकारला खडसावून सांगितले.
मोर्चामध्ये गाईचा छळ केला म्हणून माझ्यासह कार्यकर्त्यांच्यावर गुन्हा दाखल करता.मग रेवनाथ काळे या राहुरीच्या शेतकर्यांने दुधाला भाव नसल्याने आत्महत्या केली.या आत्महत्येस जबाबदार असणा-या दुग्धविकास मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कधी दाखल करता.
उध्दवा अजब तुझे सरकार !@ANI pic.twitter.com/HYMfzPt8v9— Raju Shetti (@rajushetti) August 28, 2020