कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी थकवणारे साखर कारखाने बंद पाडण्यात येतील, असा इशारा स्वाशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापुरात 19 व्या ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजू शेट्टी बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले की, न्यायालयाने साखर कारखान्यांकडून 15 टक्के व्याजदराने रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी आम्ही साखर आयुक्तांना करणार आहोत. साखर कारखान्यांनी एफआरपी थकवली ते बंद पाडणार असा इशारा त्यांनी दिला.
तसेच, त्यांनी येत्या 5 डिसेंबरला कृषि विधेयकांविरोधात 5 डिसेंबरला चक्काजाम आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.