नवी दिल्ली : गेली अनेक महिन्यांपासून कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात देखील शेतकऱ्यांनी माघार घेतलेली नाही. तर दुसरीकडे, शेतकरी रस्ते अडवून बसले आहेत, यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास विलंब होत असल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपांवर आता शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे.
शेतकऱ्यांनी कोणत्याही अत्यावश्यक वस्तूच्या पुरवठ्यात अडथळा आणलेला नाही. ऑक्सिजनच्या पुरवठ्यात अडथळा आणत असलेली वक्तव्य ही राजकीय आणि शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे राकेश टीकैत म्हणाले.
किसानों ने कोई आवश्यक वस्तुओं की सप्लाई में बाधा उत्पन्न नही की। ऑक्सीजन की सप्लाई को बाधित करने का ब्यान राजनैतिक व किसान आन्दोलन की बदनाम करने की साजिश#FarmersProtests @ANI @PTI_News @news24tvchannel @ndtvindia @BBCHindi @newsclickin @AltNews @OfficialBKU
— Rakesh Tikait (@RakeshTikaitBKU) April 21, 2021
दिल्लीच्यी सीमांवरील महामार्गांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे ऑक्सिजन पोहोचण्यास विलंब लागत आहे, असा दावा काही ऑक्सिजन निर्मात्यांनी केला आहे. राकेश टीकैत म्हणाले की, येथे आम्ही क्वारंटाइन झालेलो आहोत. आम्ही घरी जाऊ. परंतु, दिल्लीतील रोग घेऊन जाणार नाही. कोरोना झाला, तरी येथील मॅक्स रुग्णालयात उपचार घेऊ.
या मार्गावरून दररोज 300 रुग्णवाहिका जात आहेत. शेतकरीविरोधी वक्तव्य खपून घेतली जाणार नाहीत, असा इशारा देखील त्यांनी दिला.