जळगाव : सध्या राज्यात वाढीव वीज बिलाचा मुद्दा चर्चेत आहे. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नसल्याचे म्हटल्यानंतर ठाकरे सरकारवर जोरदार टीका होत आहे. आता भाजप खासदार रक्षा खडसे यांनी सरकारला इशारा देत वीज बिल माफ करण्याची मागणी केली आहे.
राज्य सरकारने वीजबिल माफ केलं नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा रक्षा खडसे यांनी दिला आहे.
रक्षा खडसे म्हणाल्या की, सरकारने वीजबिल माफ करायला हवं. ग्राहकांना कोरोना संकटात वीजबिल भरणं अशक्य आहे. कोरोना संकटामुळे काही नागरिकांना एकवेळच्या जेवणाची व्यवस्था करणे कठीण आहे. ते वीजबिल कसे भरतील?
सरकारने वीज बिलाबात योग्य भूमिका न घेतल्यास जनहितासाठी भाजप रस्त्यावर उतरणार, असा इशारा त्यांनी दिला.