अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुप्रीम कोर्टाने सीबीआयला सोपवल्यानंतर अनेक नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाने महाराष्ट्र सरकारच्या राजकीय भूमिकेला कवडीची किंमत दिली नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते राम कदम यांनी दिलीये. राम कदम यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे.
सरकारने सुशांतच्या कोट्यवधी चाहत्यांचा, त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान केला. एका मोठ्या व्यक्तीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्यासारखी सरकारची भूमिका होती. आता जो काही निर्णय असेल तो न्याय देणारा असेल, असे राम कदम यांनी म्हटले. . गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंह राजपुतचे कुटुंबियांसोबत, त्याचे चाहते व अनेक कलाकार त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत होते. सरकार अहंकारामुळे आपल्या भूमिकेवर अडून राहिले. त्यांनी मुंबई पोलिसांनाही योग्यरित्या काम करू दिले नाही. त्यांच्या कामात अनेकदा अडथळा निर्माण केला, असे देखील कदम म्हणाले