येत्या ५ ऑगस्टपासून राम मंदिराचे बांधकाम सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची आज दुपारी बैठक पार पडली या बैठीकीत हे निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान अद्याप पंतप्रधान कार्यालयाकडून याची पुष्टी झाली नाही.
याबाबत मणिराम छावणी मठाचे महंत कामंत नयन दास म्हणाले, लवकरच मंदिराचे बांधकाम सुरू होईल. पंतप्रधानांनी लवकरच येथे येऊन बांधकाम सुरू करावे अशी संतांची मागणी आहे. ते आधीच येणार होते पण कोरोना संकटामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलला गेला. आता पंतप्रधान 3 किंवा 5 ऑगस्टला येथे येऊ शकतात. परंतु अंतिम तारीख निश्चित होणे बाकी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अयोध्येतल्या संभाव्य कार्यक्रमावरही बैठकीत चर्चा होऊ शकते. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी पंतप्रधानांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण पत्र पाठवले आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ट्रस्टचे सदस्यही अयोध्येत दाखल झाले आहेत.