पुणे : वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं होतं. त्याचसंदर्भात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मावाळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर कडाडून टिका केली होती. त्याचच निषेध म्हणून भाजपने आदित्य ठाकरे यांच्या सभेच्याच ठिकाणी आदित्य ठाकरेंना पलटवार करण्याचं ठरविलं होतं. मात्र याठिकाणी लोकांनी काढता पाय घेतल्याने भाजप नेते राम कदम आणि बंडखोर खासदार श्रीरंग बारणे हे भाषण न करताच निघून गेल्याचं समजत आहे.
तानाजी सावंत अखेर मराठा समाजापुढे नमले..! म्हणाले,”आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजीनामा देईन”
मावाळमध्ये आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर वेदांत-फॉक्सकॉन प्रकरणावरून चांगलाच निशाणा साधला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच त्यांनी राज्य सरकारवर जहरी टिका देखील केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी मावाळमध्येच सभा घेण्याचं ठरवलं होतं. मात्र या सभेला लोकांनी अल्पप्रतिसाद दिल्याने राम शिंदे आणि श्रीरंग बारणे हे भाषण न करताच निघून गेले.
“माझी बहिण अन् बायको गाडीत नसती तर..”; सेनेच्या हल्लानंतर बांगरांची प्रतिक्रिया
काय राम शिंदे तरूणांनी दाखवली तुम्हाला तुमची जागा? राज्यातील तरूण हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यांना युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नसाठी एक उच्च शिक्षित, कर्तृत्वान व्यक्तिमत्व हवं. कंगणाला झांसी ची राणी आणि भरसभेत मुलींना पळवून आणून देण्याची भाषा करणारे व्यक्तीमत्व नको असं म्हणत शिवसेनेच्या पुर्व विदर्भ महिला संपर्कप्रमुख शिल्पा बोडगे यांनी निशाणा साधला आहे.
Read also
- “आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तिथेच ठेचू”; संतोष बांगरांचा सज्जड दम
- निर्मला सीतारमण यांच्या दौऱ्यानंतर सुळे ॲक्शन मोडमध्ये; बारामतील प्रत्येक गावागावात जाणार
- उद्धव ठाकरेंना आता वारकरी संघटनांचा देखील पाठिंबा..! मातोश्रीवर वारकऱ्यांची गर्दी
- नारायण राणेंना हायकोर्टापाठोपाठ सुप्रीम कोर्टातही झटका..! बंगल्यावर हातोडा पडणार
- सावंतांची चंद्रकांत पाटलांकडून पाठराखण..! म्हणाले,”ते मराठा समाजाचा आदर करतात”