मुंबई : गेल्या महिन्याभरापासून आम्हाला झोप लागत नाही, जेवण जात नाही, रात्री- अपरात्री झोपेतून उठून बसत आहे. गेली 52 वर्ष ज्या संघटनेमध्ये झोकून काम केलं तीच शिवसेना आजा आमच्या डोळ्यादेखत पत्त्यासारखी कोसळत आहे. आयुष्याच्या संध्याकाळी हे सर्व पाहण्याची वेळ आमच्यावर आली आहे. हे आमच्यासाठी खुप वेदनादायी आणि दु:खदायी आहे. असं म्हणत शिवसेनेतून हाकालपट्टी केलेले आमदार रामदास कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. टिव्ही9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांच्या डोळ्यातून पाणी देखील पडत होते.
हाकालपट्टी केलेल्या नेत्यांना विविध पदांची लॉटरी ; शिंदे गटाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर
राज्यातील शिवसैनिक याचे साक्षीदार आहेत. मात्र आज माझ्यावर शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल, असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. आमच्या परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली आहे. आयुष्याच्या संध्याकाळी पक्षाच्या माध्यमातून आमचं भविष्य अशाप्रकारे अंध:कारमय होईल, असे वाटले नव्हते. गेल्या महिनाभराचा वेळ माझ्यासाठी फार वेदनादायी आहे. मला झोप लागत नाही. जेवण जात नाही. असंही रामदास कदम यांनी म्हटले आहे.
व्हायरल व्हिडीओ नंतर श्रीकांत देशमुखांच्या अडचणीत वाढ; पुण्यात गुन्हा दाखल
शिवसेनेच्या पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन आनंदी नाही,, खुश नाही, समाधानी नाही. बाळासाहेब ठाकरे आजही माझ्या डोळ्यांसमोर दिसत आहेत. मला प्रचंड वाईट वाटत आहेत. पण ही वेळ आमच्यावर का आली, याचा विचार उद्धव ठाकरे यांनी केला पाहिजे. 52 वर्ष पक्षात काम करणारा नेता राजीनामा का देतो, याचा विचार त्यांनी केला पाहिजे, शिवसेनेच्या पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला एक फोन करायला पाहिजे होता. तुम्ही इकडे या, आपण बसून बोलूया, असे उद्धव ठाकरे बोलतील, अशी अपेक्षा होती. पण उद्धव ठाकरे यांनी माझी पक्षातून हाकालपट्टी केली. आमच्या मेहनतीमुळे तुम्ही खुर्चीवर बसलात, हे उद्धव ठाकरे यांनी विसरू नये, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला आहे.
दिपाली सय्यद अन् राऊतांकडून प्रकरण चिघळवण्याचं काम; यामुळेच शिवसेना लयास गेली?
दरम्यान, पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे काल रामदास कदम आणि आनंद आडसुळ यांनी शिवसेनेतुन हाकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर लगेचच शिंदे गटातील राष्ट्रीय कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये रामदास कदम यांना नेतेपद देण्यात आले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्य प्रमुख पदाची जबाबदारी, तर प्रवक्तेपदी दिपक केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Read also
- “बहुतेक सय्यद बंडा अन् विश्वप्रवक्ते हे दोघेच नवाब यांच्या बरोबर राहतील”
- “मुखर्जी, वाजपेयींबद्दल बोलता अन् दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना फोडण्याचं पाप करता”
- आधी रड रड रडले, नंतर दिला थेट इशारा; “आमच्यामुळे खुर्चीवर बसलात, हे उद्धव ठाकरेंनी विसरू नये”
- “पुर परिस्थिती सावरण्यासाठी राज्य सरकारने ताबडतोब पावले टाकावीत”
- “आता खऱ्या अर्थाने सत्तेत आलो”; शिंदे गटात उपनेतेपदी निवड झाल्यानंतर आढळराव पाटलांची प्रतिक्रिया