मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष हिने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहे. तिच्या या आरोपांमुळे अनुरागवर सध्या टीका होत आहे. याप्रकरणी अनुराग कश्यपला अटक करा , अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
पायल घोषला न्याय देण्यासाठी आरपीआय देशभर आंदोलन करणार आहे. तसेच याप्रकरणी पायल घोषप्रकरणी अनुराग कश्यपला अटक केली पाहिजे. अनुराग कश्यपला अटक न केल्यास ओशिवरा पोलीस स्टेशनला घेराव घालू,’ असेही रामदास आठवले म्हणाले.
दरम्यान ‘अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयने अधिक गतीने करावी. सुशांतची गळा दाबून हत्या केली आहे,’ अशी शंका रामदास आठवले यांनी उपस्थित केली आहे. यापूर्वी सुशांतच्या वकिलानेही हीच शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आता आठवलेंनीही असे म्हटले आहे त्यामुळे पुन्हा एकदा चर्चाना उधाण आले आहे.
Read Also :
मुख्यमंत्र्यांना थंड जेवण दिल्याने अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई, पण …. https://t.co/YSnvVCR2jY
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 26, 2020