माढा: सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांना पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णयाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे . यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेकडून पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले होते. यासंदर्भात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली होती. उजनी धरणातून कोणत्याही प्रकारचे पाणी इंदापूरला घेऊन जाणार नाही. तसे असेल तर आपण राजकीय संन्यास घेऊ, असा इशारा त्यांनी त्यावेळी दिला होता.
त्यानंतर आता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यात उडी घेतली आहे. उजनीचे पाणी चोरण्याचा डाव आपण उधळून लावू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे उजनीचे पाणी चोरण्याचा बारामतीकर व इंदापूरकरांनी मिळून डाव घातला आहे. उजनीचे पाणी चोरण्याचा डाव आपण उधळून लावू , मात्र त्यासाठी जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या पाठिंब्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. त्यामुळे उजनी धरणाच्या पाणी प्रश्नावरून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकारण तापल आहे.
इंदापूरसाठी मंजूर केलेल्या पाच टीएमसी पाण्याचा निर्णय शासनाने तातडीने मागे घ्यावा, अन्यथा सोलापूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात तीव्र आंदोलन खासदार नाईक निंबाळकर यांनी दिला. उजनीचे पाणी हे सोलापूर सातारा जिल्ह्याच्या हक्काचे पाणी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सहभागी होण्याची गरज उजनी पाणी प्रश्नांवर जिल्ह्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी एकत्रित येण्याची गरज आहे. पवार कुटुंबियांनी आजपर्यंत फक्त बारामतीच्या बाबतीतच विचार केला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे मुग गिळून या प्रकरणी गप्प बसणार आहेत. जिल्ह्यातील नेत्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी व चॉकलेट मिळणार असल्यामुळे या प्रश्नाविषयी कोणतीही भूमिका घेणार नसल्याची टीका खासदार निंबाळकर यांनी केली.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतलेली भूमिका
उजनी धरणातील पाणी इंदापूरला पळवल्याचा आरोप सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर करण्यात आला होता. आता या आरोपांना प्रत्युत्तर देत आपल्यावरील आरोप सिद्ध झाले तर मंत्रीपद नव्हे तर आमदारकीचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन, असे भरणे यांनी म्हटले आहेउजणी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला पळवल्याचा आरोप दत्तात्रय भरणे यांच्यावर करण्यात आला होता. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी हे आरोप केले होते. यावर आता भावूक होत भरणे यांनी सर्व आरोप फेटाळले.जिल्ह्यातील नियोजित पाण्याचा एक थेंबही इंदापूरसाठी घेतलेला नाही. आरोप सिद्ध झाल्यास मंत्रीपद नव्हेतर आमदारकीचा राजीनामा देऊन संन्यास घेणार असल्याचं दत्तात्रय भरणे म्हणाले. सध्या कोरोना संकटाचा काळ आहे. अशा संकटात राजकारण करू नये, असे आवाहन देखील त्यांनी केले.