मुंबई: राज्यात एमआयएमला भाजपची ब टिम असल्याची सातत्याने टीका केली जात असल्याने आता या पक्षाने चक्क राष्ट्रवादीला युती करण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे राज्यभरात या गोष्टीची चर्चा सध्या रंगली आहे.एक खासदार, 29 नगरसेवक आणि दोन आमदार असलेल्या एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या ऑफरची सध्या चर्चा सुरू आहे. यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. आता याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार असून यात चौथा, पाचवा कोण यामध्ये तुम्ही कशाला पडता. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचारांनी चालणारे पक्ष आहेत. हेच आमचे आदर्श असून एखाद्या पक्षाचे नेते औरंगाबादजेबाच्या पुढे कबरीपुढे जाऊन गुढघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले की, एम आय एम आणि भाजपची छुपी युती आहे, हे तुम्ही उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये पाहिलं आहे. जे आधीच भाजपबरोबर छुप्या युतीमध्ये काम करत आहे. त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध येऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.
दरम्यान, एमआयएमनं राष्ट्रवादीला दिलेल्या युतीच्या ऑफरवरून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला. ते म्हणाले की, आम्ही पाहत आहोत की ते सत्तेसाठी काय करणार आहेत. तसंही आता शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे. अजानची स्पर्धा वैगरे सुरू आहे. त्याचा परिणाम आहे का पाहूयात. एमआयएम जर महाविकास आघाडीसोबत जात असेल तर आम्हाला काही फरकत पडत नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.