नवी दिल्ली : ऍड. जयश्री पाटील यांनी, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या गंभीर आरोपाच्या चौकशीच्या याचिकेवर, मुंबई हायकोर्टात काही दिवसांपूर्वी आपला निकाल सुनावला. यात त्यांनी अनिल देशमुखांच्या १५ दिवसांच्या प्राथमिक सीबीआय चौकशीची मागणी केली होती, ज्यानंतर अनिल देशमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा, नैतिक जबाबदरी स्वीकारत मुख्यमंत्र्यांकडे दिला होता.
त्यानंतर उशिरा रात्री अनिल देशमुखांनी थेट दिल्ली गाठत, ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू संघवी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सर्वोच्च न्यायालयात, मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाला आव्हान दिले होते. तसेच राज्य सरकारने देखील आपली याचिका मुंबई हायकोर्टाच्या आव्हानाविरुद्ध न्यायालयात दाखल केली होती.
दरम्यान, आज अनिल देशमुख आणि राज्य सरकार यांच्या आव्हान याचिकेवर न्या. संजय कौल आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि अनिल देशमुखांची याचिका फेटाळल्या असून, हा दोघांसाठीही मोठा दणका मानला जात आहे. या याचिका फेटाळताना, या प्रकरणात महाराष्ट्रातील उच्च अधिकारी गुंतलेले आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणले आहे.
तसेच परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर असून, याप्रकरणी सीबीआय चौकशी होणंच उचित असल्याचं, सर्वोच्च न्यायालय म्हणालं आहे. अनिल देशमुख आणि राज्य सरकार या दोघांची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल न्यायालयात मांडत आहेत, तर ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे ऍड.जयश्री पाटील यांच्या बाजूने युक्तिवाद करत आहेत.
Supreme Court dismisses the pleas filed by Maharashtra govt and its former home minister Anil Deshmukh challenging Bombay High Court order directing a CBI probe into allegations of corruption levelled against him by former Mumbai police commissioner Param Bir Singh. pic.twitter.com/m0mliAHnFA
— ANI (@ANI) April 8, 2021
SC starts hearing a plea filed by the Maharashtra govt and former state Home Minister, Anil Deshmukh, against Bombay High Court's April 5 order of preliminary inquiry against him by the CBI into corruption allegations made by ex Mumbai police commissioner, Param Bir Singh.
— ANI (@ANI) April 8, 2021