अहमदनगर – राजकारणामध्ये काहीही शक्य आहे असं म्हणलं जातं. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात याचा अनुभव गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रत्येकाला आला आहे. राजकारणात अचानक निवडणुकीच्या दरम्यान दोन कट्टर मित्र अचानक शत्रू होतात तर दोन कट्टर शत्रू कधी एकमेकांचे मित्र बनतात हे राज्याला सुद्धा कळत नाही. अशीच काहीशी प्रचिती राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील लोकांना येत आहे.
कारण भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन मोठ्या नेत्यांनी केलेल्या छुप्या युतीची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. आणि हे दोन मोठे नेते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र म्हणजे भाजपचे खासदार सुजय विखे पाटील आणि शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार या दोघांनी केलेली मैत्री सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ही युती नेमकी का करण्यात आली ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुक येत्या २० फेब्रुवारीला होत आहे. मात्र त्याचा आधी राजकीय वातावरण चांगलंच पेटलेलं पाहायला मिळालं. थेट भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी चर्चा सुद्धा होती. या सगळ्या पार्शवभूमीवर निवडणुकीचा अर्ज देखील भरण्यात आला. ज्यामध्ये जामखेड विविध सेवा मतदारसंघातून विखे समर्थक असलेले भाजपचे जगन्नाथ राळेभात यांनी आपला अर्ज दाखल केला. तसेच त्यांचा मुलगा अमोल राळेभात यांनी सुद्धा आपला निवडणूक अर्ज दाखल केला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा जिल्हाउपाध्यक्ष सुरेश भोसले यांचा सुद्धा अर्ज दाखल कारणात आला. खरतर भाजपकडून अर्ज दाखल करण्यासाठी माजी मंत्री राम शिंदे यांनी सुद्धा पुढाकार घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र एकीकडे निवडणुकीचे अर्ज दाखल झाले असताना ऐनवेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. आमदार रोहित पार यांच्या सांगणावरून हा अर्ज मागे घेतल्याचं बोललं जात आहे.
शेतकऱ्यांच्या प्रशांसाठी आणि राजकीय हेवेदावे टाळण्यासाठी लोकांचे प्रश्न सुटावे यासाठी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने सांगितले. त्यामुळे जामखेड विविध सेवा मतदारसंघातून विखे समर्थक असलेले जगन्नाथ राळेभात यांची संचालकपदी बिनविरोध निवड होणार आहे. रोहित पवार आणि सुजय विखे पाटील यांच्या छुप्या युतीमुळे भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण राम शिंदे हे सतत रोहित पवार यांच्यावर शरसंधान साधत असतात. रोहित पवारांनी केलेला पराभव अजूनही राम शिंदे यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे सुजय विखेंनी रोहित पवारांसोबत केलेली युती ही राम शिंदे यांना रुचणार का अशी चर्चा सध्या चालू आहे.
खरंतर रोहित पवार आणि सुजय विखे यांच्यातील मैत्रीचे संबंच सर्वाना ठाऊक आहेत मात्र शरद पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील यांच्यामधील राजकीय युद्ध संपूर्ण राज्याला परिचित आहे. बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार अनेकवर्षापासूनचा आहे. त्याचाच परिचय २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत दिसून आला. कारण या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघ हा काँग्रेसला सोडला जावा आणि या मतदारसंघातून सुजय विखे पाटील याना उमेदवारी मिळावी असा प्रयत्न राधाकृष्ण विखे पाटील करत होते मात्र शरद पवार यांनी हा गाद राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे आणि ती जागा काँग्रेसला दिली जाणार आंही अससी चंग बांधला होता. त्यांनतर अखेर सुजय विखे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आणि ते भाजपचे खासदार झाले. त्यावेळी शरद पवार यांनी त्या विरुद्ध एक खोचक वक्तव्य केले होते. “दुसऱ्यांचा मुलांचा हट्ट मिका पुरवू मी माझा मुलांचा हट्ट पुरवेल” या सर्व घडामोडीनंतर शरद पवार यांचा रोख थेट विखे पाटील घराण्यावफर आहे हे पाहायला मिळाले.
या सगळ्या पार्शवभूमीनंतर एकीकडे राजकीय संगर्ष असताना रोहित पवार यांनी केलेल्या युतीचे सर्वांना नवल वाटत आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील ज्या २१ जागा आहेत त्यापैकी ४ जागा बिनविरोध झाल्या असून त्यातील ३ जागा या सुजय विखे यांच्या वाट्याला गेल्या आहेत. त्यामुळे एकीकडे जरी हि छुपी युती झाली असली तर नगरच्या राजकारणात आपलं महत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न रोहित पवार यांच्याकडून करण्यात आला आहे, माझा मर्जीशिवाय कुठलाही उमेदवार या ठिकाणी बिनविरोध निवडून येत नाही तास प्रयत्न होणे देखील शक्य नाही हे सुद्धा रोहित पवार यांनी दाखवून दिले आहे.
दरम्यान, एकीकडे जरी छुपी युती झालेली असली तरी नगरच्या राजकारणामध्ये भक्कमपणे पाय रोवण्याचा काम सध्या रोहित पवार यांनी केले आहे. आगामी काळात याचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा लक्ष होते. त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध करण्याचा रोहित पवार आणि सुराज्य विखे पाटील यांनी प्रयत्न केला त्यामुळे या सर्व घडामोडींचे नेमके काय परिणाम होतील तसेच राम शिंदे यांचे यावर काय मत असेल हे पाहणे आता तितकेच महत्वाचे आहे.