उत्तरप्रदेशात मीडियाला रोखून आणि पीडित कुटुंबाला डांबून उत्तर प्रदेश सरकार दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून करतंय!
यापूर्वी मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे या घटनेवर काही बोलणार की नाही?
आणखी किती दिवस गप्प बसणार?
की त्यांच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलीय?— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 2, 2020
आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख अभिनेत्री कंगना रणौत तिच्याकडे असल्याचं दिसतंय. कंगनाने गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई व महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावेळी तिने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. कंगनाच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर चौफेर टीका झाली होती.
Read Also :
हाथरस प्रकरण ; तृणमूल नेत्यांनाही उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की