अहमदनगर : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेवरून राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील याबाबत भाष्य केले आहे. यापूर्वी मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे या घटनेवर काही बोलणार की नाही ? असा सवाल यानिमित्ताने रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
हाथरस प्रकरणावरून काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील पीडित कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्यांना देखील पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. एवढेच काय पण काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईबद्दल केलेल्या भाष्या नंतर अनेकांनी तिचे समर्थन केले होते. त्यावरून आता रोहित पवार यांनी थेट नाव न घेता अशा लोकांना टोला लगावला आहे.
काय म्हणालेत रोहित पवार नेमकं आपल्या ट्विटमध्ये
उत्तरप्रदेशात मीडियाला रोखून आणि पीडित कुटुंबाला डांबून उत्तर प्रदेश सरकार दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून करतंय !
यापूर्वी मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे या घटनेवर काही बोलणार की नाही ?
आणखी किती दिवस गप्प बसणार ?
की त्यांच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलीय ?
उत्तरप्रदेशात मीडियाला रोखून आणि पीडित कुटुंबाला डांबून उत्तर प्रदेश सरकार दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून करतंय!
यापूर्वी मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे या घटनेवर काही बोलणार की नाही?
आणखी किती दिवस गप्प बसणार?
की त्यांच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलीय?— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 2, 2020
Read Also
योगी सरकार खूप काही लपवत आहे : खा. सुप्रिया सुळे https://t.co/ZWZ0BVQEJ7
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 2, 2020