नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा आज नागपूर येथे पार पडला. कोरोनामुळे पहिल्यांदाच स्वयंसेवकांच्या कवायती झाल्या नाहीत. हडगेवार सभागृहात मोहन भागवत यांनी शस्त्रपूजन केले. यावेळी 50 जणच उपस्थित होते. यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी चीन, कोरोना, नवीन शैक्षणिक धोरणासह विविध मुद्यांवर भाष्य केले.
कोरोनाची निर्मिती चीनमध्ये झाल्याची शंका आहे. पण या काळात चीनने आपल्या सीमेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्यासोबतच अन्य देशांशीही चीनने युद्धजन्य स्थिती निर्माण केली आहे. तो त्यांचा स्वभाव आहे. भारताने चीनला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे यावेळी भागवत म्हणाले.
चीनच्या राक्षसी महत्वाकांक्षेवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे व त्यासाठी आर्थिक क्षेत्रात, सामरिक क्षेत्रात, अंतर्गत सुरक्षा तसेच सीमा सुरक्षा व्यवस्थांमध्ये, शेजारी देशांसोबत तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये चीनहून मोठे स्थान प्राप्त करणे हाच एकमेव उपाय असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
कलम 370, राम मंदिराचा ऐतिहासिक संपूर्ण देशानं हे निर्णय संयमाने स्वीकारले. याशिवाय सीएएचा देशातील कुठल्याही नागरिकाला धोका नाही, असे भागवत म्हणाले.