बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले जात आहे – मला वाटते मुंबईने माणुसकी गमावली आहे. अशा आशयाचे ट्विट माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले होते. या ट्विटवरून आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे
“अमृताजी, देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री असताना हेच पोलीस बांधव सेवा देत होते आणि आजही तेच सेवा बजावत आहेत. पोलीस बांधव तेच आहेत, ब्रीद तेच आहे आणि कामगिरीही अभिमानास्पद आहे, बदललीय ती फक्त तुमची दृष्टी” असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला.
“सत्ता गेल्यानंतर तुमच्या वृत्तीमधला हा बदल आम्ही वर्षा बंगला सोडतानाही पाहीला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या पोलीस बांधवांवर आपण अविश्वास दाखवत आहात त्यांनी बाॅम्बस्फोट,पूर,२६/११ हल्ला आणि आत्ताच्या कोरोनाच्या संकटामध्ये मुंबईला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे.” असेही चाकणकर म्हणल्या
अमृताजी,मा.देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री असताना हेच पोलीस बांधव सेवा देत होते आणि आजही तेच सेवा बजावत आहेत. पोलीस बांधव तेच आहेत,ब्रीद तेच आहे आणि कामगिरीही अभिमानास्पद आहे बदललीय ती फक्त तुमची दृष्टी. #MAHAPolice@NCPspeaks @MHVaghadi @AnilDeshmukhNCP @MumbaiPolice
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 5, 2020