रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी रायगड पोलिसांनी मुंबई येथील त्यांच्या घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेत महविकासाघाडी सरकारवर टीका करणे सुरू केलं आहे. या प्रकरणावर आता महविकासाघाडीतील नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया येत आहे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर (महाराष्ट्र)विरोधी पक्षनेते आणि इतर बच्चा पार्टी ज्या आवेगाने विलाप करत आहेत ते पाहून मला एक गोष्ट आठवते ती म्हणजे ‘देवाच्या काठीला आवाज नसतो पण दणका जबरदस्त बसतो” अशी टीका करत त्यांनी विरोधी पक्षण प्रत्युत्तर दिले आहे.
“अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेला संशयित आरोपी अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर (महाराष्ट्र)विरोधी पक्षनेते आणि इतर बच्चा पार्टी ज्या आवेगाने विलाप करत आहेत ते पाहून मला एक गोष्ट आठवते ती म्हणजे ‘देवाच्या काठीला आवाज नसतो पण दणका जबरदस्त बसतो” असे ट्विट करत रुपाली चाकणकर यांनी भाजपवर टीका केली आहे.
अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेला संशयित आरोपी अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर (महाराष्ट्र)विरोधी पक्षनेते आणि इतर बच्चा पार्टी ज्या आवेगाने विलाप करत आहेत ते पाहून मला एक गोष्ट आठवते ती म्हणजे 'देवाच्या काठीला आवाज नसतो पण दणका जबरदस्त बसतो' (1/2)#MumbaiPolice
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 4, 2020