पुणे : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्यानंतर तिच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. मात्र कंगनाची वक्तव्य काही केल्या थांबायला तयार नाही. मुंबई कोणाच्या बापाची आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो पण संस्कारहीन ,कृतघ्न लोकांसाठी आम्ही वेळ वायाला घालवत नाही.अशा शब्दात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी कंगनाला खडे बोल सुनावले आहेत.
कंगणा राणावत तु उतरलेल्या विमानतळापासून ते तुझ्या घरापर्यंत जी मुंबई तु पाहतेस ती फक्त मुंबई पोलिसांमुळे सुरक्षित आहे असे देखील रुपालीताई पुढे म्हणाल्या आहेत.तसेच शुटींगच्या सेटपासून ते चित्रपटगृहांपर्यंत जी सुरक्षितता आहे ती मुंबई पोलिसांमुळेच आहे याची देखील आठवण रुपाली चाकणकर यांनी ट्विटच्या माध्यमातून कंगनाला करून दिली आहे.
सध्या काही काम नसल्यामुळे फुटकळ प्रसिद्धीसाठी अशी बालिश बडबड करताना स्वतःच्या तोंडाला लगाम घाल. मुंबई पोलिस देशाचा अभिमान आहेत अशा प्रकारच्या स्पष्ट भावना व्यक्त करत रुपाली चाकणकर यांनी सध्या सुरु असलेल्या कंगना प्रकरणाबाबत ट्विटच्या माध्यमातून भाष्य केले आहे.
मुंबई कोणाच्या बापाची आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो पण संस्कारहीन ,कृतघ्न लोकांसाठी आम्ही वेळ वायाला घालवत नाही.
कंगणा राणावत तु उतरलेल्या विमानतळापासून ते तुझ्या घरापर्यंत जी मुंबई तु पाहतेस ती फक्त मुंबई पोलिसांमुळे सुरक्षित आहे.(1/2)#चल_फूट @MHVaghadi @NCPspeaks— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 4, 2020