पुणे : गेल्या वर्षी महाराष्ट्रात खड्ड्यांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी या वर्षी मुंबई-गोवा महामार्गावर हा ‘स्तुत्य उपक्रम’ राबवून आपल्या सरकारच्या चेहऱ्यासमोर आरसा का धरीत नाही ? असा सवाल करीत भाजप नेते शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चोख प्रतिउत्तर दिले आहे.
‘रस्त्यात खड्डे दाखवा हजार रुपये मिळावा..’ असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी ते सत्तेत असताना केले होते. आशिष शेलार यांनी जरी हा प्रश्न सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला असला तरी मला वाटतं की मागील सरकारच्या काळातील खड्डे दाखवल्याबद्दल बक्षिसाची रक्कम बाकी राहिल्याची आठवण तर चंद्रकांत पाटील यांना शेलार करून देत नसतील ना ? असा प्रश्न रुपाली चाकणकर यांनी विचारत शेलार यांना कोकणातील रस्त्याच्या अवस्थेवरून केलेल्या टीकेला चोख प्रतिउत्तर दिले आहे.
कोकणात जाणारा रस्ता उखडून गेला आहे. मग राष्ट्रवादी आंदोलन का करत नाही ? कोकणातील लोकप्रतिनिधी, चाकरमानी यांचा आवाज सरकारला ऐकू येत नाही का ? असे म्हणत शेलार यांनी खड्ड्यांबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पत्रही लिहिले आहे.
याला उत्तर देताना चाकणकर यांनी शेलार यांना रस्त्यावरील पडलेले खड्डे दिसतात. पण महाराष्ट्राच्या हक्काच्या GST चा परतावा न दिल्यामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीला पडलेलं कृष्णविवर दिसत नाहीये, शेलारांनी हीच ताकत महाराष्ट्राच्या हक्काचा पैसा मिळवण्यासाठी लावावी, मग असले टुकार स्टेटमेंट द्यायची वेळ येणार नाही, असा सणसणीत टोला रुपाली चाकणकर यांनी शेलारांना लगावला आहे.
पण महाराष्ट्राच्या हक्काच्या GST चा परतावा न दिल्यामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीला पडलेलं कृष्णविवर दिसत नाहीये,शेलारानी हिच ताकत महाराष्ट्राच्या हक्काचा पैसा मिळवण्यासाठी लावावी मग असले टुकार स्टेटमेंट द्यायची वेळ येणार नाही..!(3/4)#कहीं_निगाहें_कहीं_पे_निशाना #ShamelessBJP
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 31, 2020