मुंबई : महाराष्ट्रातील लशींचा अपव्यय 6 टक्के नसून तो केवळ 0.22 टक्के आहे. मोदी सरकारच्याच माहितीने जावडेकरांचा हा खोटारडेपणा उघड झाला आहे. चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राची बदनामी आणि अपमान करणाऱ्या जावडेकरांनी आता महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे.
लसींच्या पुरवठ्यावरून केंद्र व राज्य सरकारमध्ये जुंपल्याचे गेल्या काही दिवसात पाहायला मिळाले होते. यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्राने लस वाया घालवल्याचा दावा केला होता. यावर आता सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
दु:ख याचे वाटते की @BJP4Maharashtra चे तुमच्यासारखे नेते राजकारणासाठी महाराष्ट्राचा अपमान व निंदा करीत आहात.
गंभीर बाब – महाराष्ट्रात फक्त २३५४७ लशी शिल्लक आहेत. मोदीजी वेळेवर लशी देत नसतील तर आम्ही जनतेची सेवा कशी करावी? #महाराष्ट्रद्रोह करण्यापेक्षा मोदींना लशी देण्यास सांगा— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 4, 2021
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. पण चुकीची धोरणे आणि नियोजनशून्य कारभाराचे खापर राज्य सरकारवर फोडून नामानिराळे राहण्याचे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. महाराष्ट्राला भरपूर लसींचा साठा दिला पण अपव्यय जास्त केला जात आहे, हा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा खोटारडेपणा उघड झाला अल्याचे सावंत म्हणाले.
महाराष्ट्रात फक्त 23547 लशी कालपर्यंत शिल्लक होत्या. नवीन लशींच्या साठ्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर वेळेवर लशी देत नसतील तर महाराष्ट्राने जनतेची सेवा कशी करावी? नियोजन कसे करावे?, असा सवाल करतानाच उठसुठ खोटे आरोप करुन महाराष्ट्रद्रोह करण्यापेक्षा महाराष्ट्राला योग्य त्या प्रमाणात वेळेवर लशीं देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगा, अशा शब्दात सचिन सावंत यांन जावडेकरांना सुनावले.