अहमदनगर: निळवंडे धरणाच्या Nilwande dam canal कालव्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी नुकताच अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला होता. कोरोना महामारीचा सध्याचा कठीण काळ असल्याने कुठेही उद्घाटनाचा कार्यक्रम नव्हता. पाणीक्षेत्रातील अभियंत्यांवर योग्य तो दबाव राहावा, शेतीविषयक कामे जलदगतीने व्हावीत आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाणी मिळावे यासाठी आणि कोणत्याही प्रकारची गर्दी नको कोणत्याही लोकप्रतिनिधींना आमंत्रण देण्यात आले नव्हते असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील कार्यक्रम असताना खासदार या नात्याने शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे Shirdi MP Sadashiv Lokhande यांना या कार्यक्रमात आमंत्रित न केल्याने त्यांनी जाहीरपणे याबाबत नाराजी व्यक्त केली होती. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोरोना काळात गर्दी केल्यामुळे त्यांच्यावर नियमावली तोडली म्हणून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी देखील खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली होती. त्यावर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
राहुरी येथील कृषी विद्यापीठ येथे पत्रकार परिषदेत बोलत असताना राज्यमंत्री तनपुरे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या दौऱ्याच्या बद्दल खुलासा केला. ते म्हणाले की महाविकास आघाडी सरकारने निळवंडे धरणाच्या कालव्याच्या प्राधान्यासाठी विशेष निधी दिला आहे. कोरोना काळात राज्याच्या आर्थिक तिजोरीत खडखडाट असताना देखील निळवंडे धरणाचे काम प्रगतीपथावर आहे. भारतीय जनता पक्षाने फक्त ९% कालव्यांची कामे केली होती आणि आता आम्ही तब्ब्ल ४७% एवढी कामे केली आहेत. १८% प्रगतीपथावर आहेत आणि बाकी कामांसाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटलांकडे पाठपुरावा करत आहोत असे देखील तनपुरे म्हणाले.
काय म्हणाले जयंत पाटील
निळवंडे धरणाच्या कालव्याची Nilwande dam canal पहाणी करण्यासाठी जयतं पाटील तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी एकत्रित शनिवारी अचानक अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कालव्यांची आज पाहणी केली. या वेळी बोलतानाजयतं पाटील म्हणाले की निळवंडे धरणाच्या कालव्याला कामाला आपण गती दिली आहे. या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही. यावर्षी पाचशे कोटी रूपये खर्च होतील अशी आपण अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. तसेच डिसेंबर २०२२ या वर्षात कालव्यांचे काम पुर्ण होईल आणि निळवंडे धरणातुन पाण्याचे आवर्तन सोडले जाईल.आणि हा परीसर सुजलाम-सुफलाम होईल असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी केले आहे.
शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल
कोरोना काळातील जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह कृती समितीच्या अकरा जणांवर गुन्हे दाखल होता. निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी गेल्या पन्नास वर्षांपासून धरणाच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मुख्य कालव्यांचे काम प्रगतिपथावर आहे. पिंपरी निर्मळपासून निळवंडेच्या अंत्य कालवा सुरू होतो. या कालव्याची निविदा प्रसिध्द होऊन वर्कऑर्डर झाली आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पिंपरी निर्मळ शिवारात अंत्य कालव्याच्या भूमीपुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खासदार लोंखडे सह निळवंडे पाटपाणी कृती समितीचे सदस्यही यावेळी हजर होते.