ठाणे : मनसे राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणानंतर त्यांच्यावर चौफेर टिका करण्यात आली. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसेतील अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर त्यांच्यावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांना आता राज ठाकरे हे ठाण्यातील सभेतुन काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून होतं. त्याआधी मनसे नेते संदिप देशपांडे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.
संदीप देशपांडे म्हणाले की, पुण्याचे आमचे वैचारीक नेते कुणी असतील तर तात्या मोरे आहेत. तात्यांचे आभार मानतो. पाडव्याच्या दिवशी भूतो न भविशष्यती सभा झाली. कोरोना काळानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि पहिली राजकीय सभा झाली असेल तर ती मनसेची झाली आहे. अख्या महाराष्ट्राचं लक्ष या सभेकडे लागून होतं. राज साहेबांनी प्रखर पणे या सभेत विचार मांडले होते.
जर शिवसेनेचा इतिहास आपण तपासून पाहिलं तर शिवसेनेला वसंतसेना असं म्हटलं जायचं. वसंत सेना का म्हटलं जायचं तर वसंत रावांनी त्या पुर्नजीवन शिवसेनेला दिले. मुंबई महाराष्ट्रापेक्षा वेगळी गेली. जाईल असं म्हटलं त्यावेळी वसंतसेना आताची शरदसेना असा मोठा प्रवास आहे. आमच्याबद्दल नाही बोलायचं काॅंग्रेस म्हणते सेना आमची बी टीम, राष्ट्रवादी म्हणत आमची बी टीम, असंही ते म्हणाले
डोळा एकाला मारलं, प्रेम एका बरोबर केलं लग्न एकाबरोबर आणि हनिमुन चोथ्याबरोबर केलं आणि तुम्ही आम्हाला विचारणार प्रश्न राजसाहेबांनी जी भूमिका घेतली ती ठामच घेतली आहे असंही ते म्हणाले. दरम्यान, पुण्यात सोळा दिवसात 16 उद्यानं साकारणारा मी एकमेवर नेता आहे. राज ठाकरे यांच्या स्वप्नातला काम आपल्याला दाखवावं लागेल. राज्यात मनसेची सत्ता आल्यास अमेरिकेतून फोन येतील. 15 वर्ष भाजपच्या उमेदवारांना धुळ चारत मी नगरसेवक झालो. आपली कामं ही सर्वसामान्या लोकांना दाखवावी लागतील,तर आपण राज्यात सत्ता स्थापन करू असंही वसंत मोरे म्हणालेत.