कल्याण : रेल्वे गाडयांची सुविधा सुरू करावी या मागणीसाठी देशपांडे यांनी तीन कार्यकत्र्यासह कजर्त ते शेलू या रेल्वे स्थानकाच्या दरम्यान प्रवास केला होता. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने देशपांडे यांच्यासह तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र रेल्वे सहाय्यक पोलिस आयुक्तांनी जामीन मंजूर केला आहे.
मागील आठवड्यात देशपांडे यांना कल्याण रेल्वे न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना १५ हजारांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र रेल्वे पोलिसांनी देशपांडे यांच्या विरोधात १०७ कलमान्वये कारवाई केल्याने आज पुन्हा रेल्वे सहाय्यक पोलिस आयुक्तांसमोर हजर राहावे लागले. देशपांडे यांच्यासह तीन कार्यकर्त्यांच्या जामीनाची तयारी मनसेने केली होती .
दरम्यान आज झालेल्या सुनावणी नंतर देशपांडे यांनी सरकार विरोधात संतप्त प्रतिक्रिया दिली होती. आम्ही सविनय कायदेभंग आंदोलन लोकहितासाठी केले होते. ‘कायद्याची प्रोसिजर ते आता पार पाडत आहेत. मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावं, ज्यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं सरकार येईल तेव्हा हा सर्व हिशोब व्याजासकट चुकता होईल. आता जो त्रास देताय ते लक्षात ठेवतोय. त्याची नोंद करुन ठेवतोय’ असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
SSR प्रकरणामध्ये एम्स ने दिलेल्या अहवालामुळे भाजपचे तोंड काळे झालेhttps://t.co/mmPouRhoFY#SSRCase #BJP #Congress #Shivsena
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 29, 2020